Tuesday, 11 November 2014

बाप

छोटासाच प्रसंग.. प्रसंग पण नव्हे दृश्य.

गौरी गणपती आले की कोकणात चाकरमानी कसे निघतात हे काय सांगायला हवं? रेल्वे, प्रायव्हेट गाड्या, एस्टी सर्व सर्व अगदी भरून तुडुंब वाहत असतात. त्यातून यंदा गणपती आले रविवारी. म्हणजे ज्याना सुट्टी मिळत नाही असा देखील गावाला जायला निघाला.

गणपती येतात गावच्या घरी आणि खरेदी असते ती मात्र मुंबईत. मग थर्माकोलचे मखर, वेगवेगळे लाईट्स आणि असंच काही ना काही सजावटीचं सामान. चाकरमान्याची शान काही वेगळीच असते. त्याला देण्यासाठी म्हणून त्याची आई, काकी, वहिनी वेगवेगळे पदार्थ करून ठेवते. आणि त्याच्या येण्याकडे अख्खं घर वाट बघत असतं.

आम्ही खेडला गणपतीला शनिवारी जायला निघालो. रीझर्वेशन केलेले नव्हते. त्यामुळे आयत्या वेळेला कुठल्याच बसमधे आम्हाला चढता येइना. मग आम्ही वाशी ते पनवेल. पनवेल ते पेण. पेण ते महाड, महाड ते पोलादपूर आणि पोलादपूर ते खेड अशा गाड्या बदलत बदलत प्रवास केला. (गंमत म्हणजे पोलादपूरला आम्ही पकडली ती मुंबई खेड एस्टी.)

पूर्ण प्रवासात पाऊस कुठेच मिळाला नाही. पण कशेडी घाट सोडल्यावर मात्र तूफान पाऊस. रात्र पण होत आली होती. गाडी घाट उतरल्यावर प्रत्येक स्टॉपवर थांबायला लागली. पेंगुळल्या डोळ्यानी पण उत्साहानी चाकरमानी उतरायला लागले. बोरघर कशेडी अशी छोटी छोटी गावं लागत होती

अशाच कुठल्या तरी एका स्टॉपला गाडी थांबली. खेड अवघ्या पंधरा मिनिटावर आलं होतं. बाहेर एक म्हातारा उभा होता. एंशीच्या आसपास वय, अर्धवट पडलेलं टक्कल, सर्वच दाताचा झालेला "अण्णू गोगट्या" आणि हिरवट मिचमिचे डोळे. अंगावर एक फाटका बनियन आणि धोतर. हातात एक काठी आणि एक बॅटरी.

गाडी थांबल्या थांबल्या त्याची नजर दाराकडे वळली. उतरणारे उतरले. पण त्याची ती नजर तशीच. डोळ्यामधली ती प्रतिक्षा तशीच. किती वेळ उभा होता तो कुणास ठाऊक? अजून किती वेळ थांबला असता कुणास ठाऊक. पाऊस कोसळतच होता. आणि तरीपण म्हातारा हातातली बॅटरी घेऊन उभाच होता.
वाट बघत!!

बहुतेक कुणाचा तरी बाप असावा तो!! हो ना?

बाप

छोटासाच प्रसंग.. प्रसंग पण नव्हे दृश्य.

गौरी गणपती आले की कोकणात चाकरमानी कसे निघतात हे काय सांगायला हवं? रेल्वे, प्रायव्हेट गाड्या, एस्टी सर्व सर्व अगदी भरून तुडुंब वाहत असतात. त्यातून यंदा गणपती आले रविवारी. म्हणजे ज्याना सुट्टी मिळत नाही असा देखील गावाला जायला निघाला.

गणपती येतात गावच्या घरी आणि खरेदी असते ती मात्र मुंबईत. मग थर्माकोलचे मखर, वेगवेगळे लाईट्स आणि असंच काही ना काही सजावटीचं सामान. चाकरमान्याची शान काही वेगळीच असते. त्याला देण्यासाठी म्हणून त्याची आई, काकी, वहिनी वेगवेगळे पदार्थ करून ठेवते. आणि त्याच्या येण्याकडे अख्खं घर वाट बघत असतं.

आम्ही खेडला गणपतीला शनिवारी जायला निघालो. रीझर्वेशन केलेले नव्हते. त्यामुळे आयत्या वेळेला कुठल्याच बसमधे आम्हाला चढता येइना. मग आम्ही वाशी ते पनवेल. पनवेल ते पेण. पेण ते महाड, महाड ते पोलादपूर आणि पोलादपूर ते खेड अशा गाड्या बदलत बदलत प्रवास केला. (गंमत म्हणजे पोलादपूरला आम्ही पकडली ती मुंबई खेड एस्टी.)

पूर्ण प्रवासात पाऊस कुठेच मिळाला नाही. पण कशेडी घाट सोडल्यावर मात्र तूफान पाऊस. रात्र पण होत आली होती. गाडी घाट उतरल्यावर प्रत्येक स्टॉपवर थांबायला लागली. पेंगुळल्या डोळ्यानी पण उत्साहानी चाकरमानी उतरायला लागले. बोरघर कशेडी अशी छोटी छोटी गावं लागत होती

अशाच कुठल्या तरी एका स्टॉपला गाडी थांबली. खेड अवघ्या पंधरा मिनिटावर आलं होतं. बाहेर एक म्हातारा उभा होता. एंशीच्या आसपास वय, अर्धवट पडलेलं टक्कल, सर्वच दाताचा झालेला "अण्णू गोगट्या" आणि हिरवट मिचमिचे डोळे. अंगावर एक फाटका बनियन आणि धोतर. हातात एक काठी आणि एक बॅटरी.

गाडी थांबल्या थांबल्या त्याची नजर दाराकडे वळली. उतरणारे उतरले. पण त्याची ती नजर तशीच. डोळ्यामधली ती प्रतिक्षा तशीच. किती वेळ उभा होता तो कुणास ठाऊक? अजून किती वेळ थांबला असता कुणास ठाऊक. पाऊस कोसळतच होता. आणि तरीपण म्हातारा हातातली बॅटरी घेऊन उभाच होता.
वाट बघत!!

बहुतेक कुणाचा तरी बाप असावा तो!! हो ना?

Monday, 10 November 2014

मारायला नाही दिली मी माझी लेक तुला!!




"आज आपण शिकलेलो आहोत, सुशिक्षित आहोत, आपल्याला कायद्याची जाण आहे. म्हणून कुणी आपला फायद घेऊ शकत नाही. पण माझं हृदय अशा स्त्रियांसाठी तुटतं ज्या अशिक्षित आहेत. त्याना कायदा माहित नाही. नवर्‍याने, सासूने मारलं की रडायचं इतकंच माहिती आहे. अशा स्त्रियापर्यंत आपल्या संस्थेचं काम पोचलं पाहिजे. त्याना आपली मदत झाली पाहिजे..." 


नरिमन पॉइंटच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधे वाळकेश्वरसारख्या ठिकाणी राहणार्‍या या श्रीमती समाजसेविका यांचे भाषण. आता मला ते भाषण आठवायचं कारण मात्र वेगळंच होतं.. हॉस्पिटलमधे माझ्या बाजूला बसलेली एक विधवा आई आणि तिच्यासोबत एकोणीस वर्षाची मुलगी. 

आई कुणबी मामी नेसतात तशी गुडघ्यापर्यंतची नव्वार नेसलेली. गळ्यात सोन्याची चेन. अख्ख आयुष्य उन्हातान्हातून गेलय याचा पुरावा देणारा तो कोकणी रंग. तंबाखूने लाल झालेले दात. मुलीची गोल पाचवारी साडी. हातभर बांगड्या. गळ्यात छोटंसं मंगळसूत्र. एकंदर परिस्थिती दारिद्र्य रेषेखालचीच. 

मुलीचे डोळे रड रडून सुजलेले. आई चिंतेत. तिला राहवत नाही. ती मुलीला पाणी प्यायला देते. मुलीच्या घशातून एक अस्फुट हुंदका येतो न येतो.. पाणी नको म्हणते. आई उठून नर्सकडे जाते. "अजून किती वेळ? पोरीला बसवत नाही". नर्स म्हणते अजून दोन तीन नंबर आहेत. 

माझा नंबर त्या मुलीनंतर आहे. त्यामुळे मी निवांत. ती परत येऊन बसते. "कालजी नको करू" ती पोरीला समजावते. 

मी त्या दोघींकडे अजून बघतेच आहे. मला नाही तरी दुसरं काय काम??

"दोन महिने झाले होते.." आई माझ्याशी बोलते. मी नुसती बघते.
"मग नर्सला सांगा जर काही इमर्जन्सी असेल तर लवकर डॉक्टरकडे न्यायला,,"
"बाईनं तपासलं मगाशी. सोनोग्रापी करा म्हणलेत म्हणून थांबलोय.." आई मला सांगते. मुलगी खाली मान घालून बसलीये. 

"अच्छा.." मला पुढे काय बोलायचं सुचत नाही. पण आता आईला ऐकायला कोणतरी मिळालय. 

"चांदेराईवरून आलो. पोरीचं लग्न करून देऊन चार महिने पण नाही झालं. काल रातीला आनून सोडली तिला. मार मार मारलं तिच्या सासूने."
मला धक्का बसतो. जणू सासूने सुनेला मारणं मी आयुष्यात कधी पाहिलंच नाही. बरोबर, मी पांढरपेशी मध्यमवर्गीय गृहिणी. आमच्याकडे नाही हो सासवा अशा मारत. त्याचा वेगळा सुशिक्षित सासुरवास असतो. 

"बालाला काय झालं ते बघायचय. तसा हिला काही त्रास नाही. थोडं अंगावरून गेलं असं सकाळी म्हणत होती. पन बाई म्हनल्या आतून तपासूनच बघूया. म्हनून थांबलो.." आई आता दवाखान्यात असल्याचं बहुतेक विसरल्या. ऐटीत तंबाखूची चंची बाहेर आली. नर्सचं लक्ष नव्हतं म्हणून नशीब!!!

"मला तीनच पोरी. ही सर्वात मोठी. चार वर्साची होती तेव्हा बा गेला तिचा. मी काय.. काय करनार. भाजीपाला हाय, आंब्याची चार. माड पोफली हाय पाच सात.. त्याच्यावर घर चालवनार. बारावी शिकली आनि लग्न केलं.. पुडं शिकायचं होतं. पन मंग आमच्याकडचे पोरं शिकली पोरगी नको म्हणतात म्हनुन शिकणं थांबवलं.. "

मी मनात म्हटलं आमच्याक्डे तरी कोण पोरगे स्वतःपेक्षा जास्त शिकलेली मुलगी पसंद करतात???
"सासूने मारलं तर पोलिसात तक्रार वगैरे काही केलीत का?" मी परत मध्यमवर्गीयपणा दाखवला. माझ्या सासूने मारलं असतं तर मी गेले असते का पोलिसात.. हा प्रश्न स्वतःला न विचारता. 

"पोलिस कशाला?? आधी पोरीचं सगलं ठिक होउदे मग बघू या..."

तेवढ्यात नर्स तिला सोनोग्राफीला बोलावते. माझा पण नंबर येतो. मी डॉक्टरच्या रूमकडे जाते. 

तसं बघायला गेलं तर प्रसंग माझ्या लक्षात पण राहिला नसता.. जर आई आणि तिची मुलगी मला परत हॉस्पिटलच्या बाहेर पार्किंगजवळ दिसले नसते तर. 

मुलीच्या चेहर्‍यावर जरा हायसं होतं,, म्हणजे एकूण सर्व नॉर्मल असावं. रडणं पण थांबलं होतं. आणि ती आपल्या आईकडे कौतुकानं बघत होती.
आईने शिस्तीत हातात मोबाईल घेतला होता. पलीकडे कोण बोलतय सांगायची गरजच नव्हती...
आई आता नुसती "आई" नव्हती. रणचंडिका होती. तिला शोभेल असा आवाज होता आणि भाषा होती...

"ए.. झवाडे... तुला मारायला दिली होती का गं माझी लेक... नाय येत तिला भाकरी बडवायला.. मी नाय शिकवलं तिला.. म्हनुन तू कोन तिच्यावर हात उचलनारी.. तिच्या हातच्या स्वैपाकाला चव नसेल तर तुझं तू शिजवून घेत जा. पोर काय तुझं ताट वाढायला म्हनून दिली मी???? याद राख.. एकली बाई आहे म्हनून उगाच समजून नकोस. आज तिच्या पोटातल्या बालाला काय झालं असतं ना घरी येऊन तुझी तंगडी मोडेन मी. हां.. माजी लेक काय मला जड नाही झाली. एकोणीस वर्षं सांभालली तशी अजून पन सांभालेन.. समजून र्‍हा. परत माझ्या पोरीच्या अंगाला हात जरी लावलस ना तर तुज्या गावात येऊन व्हानेनं जीव घेन तुझा. तू मारावं म्हनून दिली नाही माझी लेक तुला.."

श्रीमती समाजसेविका अजूनपण त्याच्या एसी हॉलमधे भाषण देत आहेतच. कारण, अजून त्यानी अशी रणचंडी आई पाहिलेलीच नाही त्याच्या आयुष्यात!!!

मारायला नाही दिली मी माझी लेक तुला!!




"आज आपण शिकलेलो आहोत, सुशिक्षित आहोत, आपल्याला कायद्याची जाण आहे. म्हणून कुणी आपला फायद घेऊ शकत नाही. पण माझं हृदय अशा स्त्रियांसाठी तुटतं ज्या अशिक्षित आहेत. त्याना कायदा माहित नाही. नवर्‍याने, सासूने मारलं की रडायचं इतकंच माहिती आहे. अशा स्त्रियापर्यंत आपल्या संस्थेचं काम पोचलं पाहिजे. त्याना आपली मदत झाली पाहिजे..." 


नरिमन पॉइंटच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधे वाळकेश्वरसारख्या ठिकाणी राहणार्‍या या श्रीमती समाजसेविका यांचे भाषण. आता मला ते भाषण आठवायचं कारण मात्र वेगळंच होतं.. हॉस्पिटलमधे माझ्या बाजूला बसलेली एक विधवा आई आणि तिच्यासोबत एकोणीस वर्षाची मुलगी. 

आई कुणबी मामी नेसतात तशी गुडघ्यापर्यंतची नव्वार नेसलेली. गळ्यात सोन्याची चेन. अख्ख आयुष्य उन्हातान्हातून गेलय याचा पुरावा देणारा तो कोकणी रंग. तंबाखूने लाल झालेले दात. मुलीची गोल पाचवारी साडी. हातभर बांगड्या. गळ्यात छोटंसं मंगळसूत्र. एकंदर परिस्थिती दारिद्र्य रेषेखालचीच. 

मुलीचे डोळे रड रडून सुजलेले. आई चिंतेत. तिला राहवत नाही. ती मुलीला पाणी प्यायला देते. मुलीच्या घशातून एक अस्फुट हुंदका येतो न येतो.. पाणी नको म्हणते. आई उठून नर्सकडे जाते. "अजून किती वेळ? पोरीला बसवत नाही". नर्स म्हणते अजून दोन तीन नंबर आहेत. 

माझा नंबर त्या मुलीनंतर आहे. त्यामुळे मी निवांत. ती परत येऊन बसते. "कालजी नको करू" ती पोरीला समजावते. 

मी त्या दोघींकडे अजून बघतेच आहे. मला नाही तरी दुसरं काय काम??

"दोन महिने झाले होते.." आई माझ्याशी बोलते. मी नुसती बघते.
"मग नर्सला सांगा जर काही इमर्जन्सी असेल तर लवकर डॉक्टरकडे न्यायला,,"
"बाईनं तपासलं मगाशी. सोनोग्रापी करा म्हणलेत म्हणून थांबलोय.." आई मला सांगते. मुलगी खाली मान घालून बसलीये. 

"अच्छा.." मला पुढे काय बोलायचं सुचत नाही. पण आता आईला ऐकायला कोणतरी मिळालय. 

"चांदेराईवरून आलो. पोरीचं लग्न करून देऊन चार महिने पण नाही झालं. काल रातीला आनून सोडली तिला. मार मार मारलं तिच्या सासूने."
मला धक्का बसतो. जणू सासूने सुनेला मारणं मी आयुष्यात कधी पाहिलंच नाही. बरोबर, मी पांढरपेशी मध्यमवर्गीय गृहिणी. आमच्याकडे नाही हो सासवा अशा मारत. त्याचा वेगळा सुशिक्षित सासुरवास असतो. 

"बालाला काय झालं ते बघायचय. तसा हिला काही त्रास नाही. थोडं अंगावरून गेलं असं सकाळी म्हणत होती. पन बाई म्हनल्या आतून तपासूनच बघूया. म्हनून थांबलो.." आई आता दवाखान्यात असल्याचं बहुतेक विसरल्या. ऐटीत तंबाखूची चंची बाहेर आली. नर्सचं लक्ष नव्हतं म्हणून नशीब!!!

"मला तीनच पोरी. ही सर्वात मोठी. चार वर्साची होती तेव्हा बा गेला तिचा. मी काय.. काय करनार. भाजीपाला हाय, आंब्याची चार. माड पोफली हाय पाच सात.. त्याच्यावर घर चालवनार. बारावी शिकली आनि लग्न केलं.. पुडं शिकायचं होतं. पन मंग आमच्याकडचे पोरं शिकली पोरगी नको म्हणतात म्हनुन शिकणं थांबवलं.. "

मी मनात म्हटलं आमच्याक्डे तरी कोण पोरगे स्वतःपेक्षा जास्त शिकलेली मुलगी पसंद करतात???
"सासूने मारलं तर पोलिसात तक्रार वगैरे काही केलीत का?" मी परत मध्यमवर्गीयपणा दाखवला. माझ्या सासूने मारलं असतं तर मी गेले असते का पोलिसात.. हा प्रश्न स्वतःला न विचारता. 

"पोलिस कशाला?? आधी पोरीचं सगलं ठिक होउदे मग बघू या..."

तेवढ्यात नर्स तिला सोनोग्राफीला बोलावते. माझा पण नंबर येतो. मी डॉक्टरच्या रूमकडे जाते. 

तसं बघायला गेलं तर प्रसंग माझ्या लक्षात पण राहिला नसता.. जर आई आणि तिची मुलगी मला परत हॉस्पिटलच्या बाहेर पार्किंगजवळ दिसले नसते तर. 

मुलीच्या चेहर्‍यावर जरा हायसं होतं,, म्हणजे एकूण सर्व नॉर्मल असावं. रडणं पण थांबलं होतं. आणि ती आपल्या आईकडे कौतुकानं बघत होती.
आईने शिस्तीत हातात मोबाईल घेतला होता. पलीकडे कोण बोलतय सांगायची गरजच नव्हती...
आई आता नुसती "आई" नव्हती. रणचंडिका होती. तिला शोभेल असा आवाज होता आणि भाषा होती...

"ए.. झवाडे... तुला मारायला दिली होती का गं माझी लेक... नाय येत तिला भाकरी बडवायला.. मी नाय शिकवलं तिला.. म्हनुन तू कोन तिच्यावर हात उचलनारी.. तिच्या हातच्या स्वैपाकाला चव नसेल तर तुझं तू शिजवून घेत जा. पोर काय तुझं ताट वाढायला म्हनून दिली मी???? याद राख.. एकली बाई आहे म्हनून उगाच समजून नकोस. आज तिच्या पोटातल्या बालाला काय झालं असतं ना घरी येऊन तुझी तंगडी मोडेन मी. हां.. माजी लेक काय मला जड नाही झाली. एकोणीस वर्षं सांभालली तशी अजून पन सांभालेन.. समजून र्‍हा. परत माझ्या पोरीच्या अंगाला हात जरी लावलस ना तर तुज्या गावात येऊन व्हानेनं जीव घेन तुझा. तू मारावं म्हनून दिली नाही माझी लेक तुला.."

श्रीमती समाजसेविका अजूनपण त्याच्या एसी हॉलमधे भाषण देत आहेतच. कारण, अजून त्यानी अशी रणचंडी आई पाहिलेलीच नाही त्याच्या आयुष्यात!!!

Sunday, 9 November 2014

दरवाजा (भाग 8)

दारावरची बेल तीनचारदा वाजल्यावर रेश्मानं उठून दरवाजा उघडला. बाहेर उभी असलेल्या माहीकडं बघून ती एकदम चमकली. “आत ये ना” ती कशीबशी म्हणाली.
माही आतमध्ये येऊन खुर्चीवर बसली. “बरं वाटतंय?” रेश्मानं विचारलं. माहीनं फक्त मान हलवली.
“तुला बेडरेस्ट सांगितली ना? हा चेहरा काय झालाय? काही खाल्लंस?” तिनं परत एकदा विचारलं.
“काहीच जात नाहीये.. गेले तीन दिवस.. डॉक्टरकडे जाऊन एक सलाईन लावलं.. पण तरीही..” माही थकल्या आवाजात म्हणाली. रेश्मानं पुढं येऊन माहीचा हात हातात घेतला. “आताच अशी सुकलीस तर कसं चालेल? अजून पुढचं निभवायचं आहे... थोडी दालखिचडी देऊ तुला? खाशील?”
“खरंच, मला काहीच खावंसं वाटत नाहीये. जबरदस्त नॉशिया... अगदी विचार केला तरी मळमळतं. जीव नकोसा झालाय...”
“मी गरम करून आणते. जितकं जाईल तितकं खा. उलटी झालीच तर आपण निस्तरू. उपाशीच राहिली तर कसं चालेल..” बोलत रेश्मा किचनच्या दारापर्यंत गेली. पण अचानक वाटेत थांबली आणि मागे वळून म्हणाली.
“माझ्या... माझ्या हातचं चालेल ना तुला?” ते ऐकताच माहीच्या डोळ्यांतून पाणी आलं. “असं मी कधी म्हणेन तरी का?” ती कशीबशी बोलली. “मला खिचडी वगैरे नको. तुम्ही कायम बनवता तसा दहीभात करून द्याल? अगदी थोडासा. मी खाईन”
रेश्मा हसली. “करते. तू इथं पडतेस का? बेडरेस्ट आहे ना?”
“नाही. बसते थोडावेळ. गेले पंधरा दिवस घरातच आहे. त्यामुळे फार कंटाळलेय.” रेश्मानं फ्रीझमधून दही दूध बाहेर काढलं. “चैत्रा अश्विन दिसले नाहीत?”
“ वन्संकडे सोडलय. चैत्राची परीक्षा चालू आहे. नववीचं वर्ष. उगाच घरामधले प्रॉब्लेम्स..” रेश्मा कूकरमधला भात चमच्यानं काढताना अचानक थांबली.
“आणि मोहितदादा?”
“बॅंकेत गेलेत. संध्याकाळी येतीलच” रेश्मानं विषय संपवला. माहीपण गप्प बसली.
किचनमधून मोहरी तडतडल्याचा आवाज आल्यावर माहीला वाटलं, परत तो जबरदस्त नॉशियाचा त्रास होणार. ती पुढं काही बोलणार इतक्यात त्या फोडणीत हिंग पडल्याचा खमंग वास आला, आणि माहीला इतक्या दिवसांनी भुकेची जाणीव आली. खुर्चीवर डोकं मागे टेकवून तिनं डोळे बंद केले आणि तो घरभर पसरलेला वास श्वासानं ओढून घेतला. असिफ तिला जे आवडेल ते बनवत होता, बाहेरून मागवत होता, पण गेले पंधरा दिवस काहीही खायची इच्छा होत नव्हतीच. समोर अन्न दिसलं तरी मळमळायचं, तोंडातला घास तसाच फिरायचा. तिला दर दोन दिवसांनी डॉक्टरकडं घेऊन जात होता. तिची मनस्थिती सुधारावी म्हणून त्याच्यापरीनं कायकाय करत रहायचा.
रेश्मानं तिच्यासमोर एका छोट्या ताटलीत दहीभात ठेवला. “मुद्दाम कमी दिलाय हां, कधीकधी ना भरलं ताट बघितलं की जास्त त्रास होतो.. मला अश्विनच्या वेळेला तसं व्हायचं. मग आई असं तीन चार घासाचं खायला द्यायची...”
माहीनं एक घास खाल्ला. “तुम्ही किती छान बनवता हो.. मला तुमच्यासारखं असं कधीच बनवता यायचं नाही” ती म्हणाली.
“मागच्यावेळी काय सांगितलं तुला? सरावाचा प्रश्न असतो.. बाकी काही नाही” माही शांतपणे ताटलीतला दहीभात खात राहिली. “अजून देऊ?” रेश्मानं विचारलं. माहीनं नको म्हणून सांगितलं. “मी जाताना घरी घेऊन जाईन. रात्री भूक लागली तर खाईन”
“कशाला? जेव्हा भूक लागेल तेव्हा मी ताजं बनवून देत जाईन. तुला काय खावंसंप्यावंसं वाटतंय ते मला बिनधास्त सांग. तुझ्यासाठी मला कुणी काही बोललं तरी ऐकून घेईन, पण तुझे असे हाल झालेले मला बघवणार नाहीत.. मी कितीही वाईट आणि खोटारडी असले तरी दुष्ट नक्कीच नाही.” रेश्मा डोळ्यांतलं पाणी पुसत म्हणाली.
माही क्षणभर गप्प बसली. मग नंतर हळू आवाजात तिनं विचारलं. “मोहितदादा नीट वागतायत ना?”
“ते बोलतच नाहीत माझ्याशी. गेले पंधरा दिवस... एक अक्षरदेखील नाही. मी सगळं खरं काय ते सांगितलं. आता खोटं बोलून काय उपयोग? त्यांनी ऐकून घेतलं. मुलांना बहिणीकडे सोडून आले. रवीदादाला बहुतेक फोन केला होता. तो इकडे यायचं म्हणत होता तर त्यांनीच नको म्हणून सांगितलं. मला काहीच म्हणत नाहीत. रवीदादा येणार म्हणजे गावातले गुंड घेऊन यांनाच धमकावणार, म्हणून भिती वाटत होती. आईला फोन केला आणि सर्व नीट झालं म्हणून सांगितलं.”
“आय ऍम सॉरी. मी खरंतर आधीच येणार होते. पण असिफ कायम घरातच. चोवीस तास नजरकैदेत पडल्यासारखं झालं होतं. आज जरा कुठं बाहेर गेलाय म्हणून मी आले. त्या दिवशी असिफ जे काही वागला, त्यासाठी मी... मी त्याला माफ नाही करणार. माझ्यासमोर तो लाख वेळा सॉरी म्हणाला असेल... पण तरी नाहीच.”
“आताच नाही, आधीपासूनच त्याचा स्वभाव थोडासा असाच आहे. खूप शांत आहे असं वाटतं, पण ज्वालामुखी एकदा भडकला की काय खरं नाही! माही, मी माझ्या दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगते.... मी तुझ्याबद्दल कुणासमोरही काही बोलले नाही. मला कधीच..”
“मला माहित आहे. ही चर्चा गीतानं चालू केली. तिनं माझं आणि असिफचं काहीतरी बोलणं ऐकलं होतं- मी मध्यंतरी त्याच्याशी खूप भांडले होते तेव्हा, त्याचा हवा तसा अर्थ लावला आणि सर्वांना सांगितलं. मी परवा तिला असिफसमोरच चांगलंच खडसावलं तेव्हा कुठे कबूल झाली. तुम्ही माझ्याविषयी काही बोलणर नाहीत हे मला माहित आहे... अन्यथा मी तुम्हाला काही सांगितलंच नसतं ना? तेवढा तुमच्यावर विश्वास आहे.”
“एवढा विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद...” रेश्मा माहीच्या समोरची ताटली उचलत म्हणाली. “सरबत घेशील?”
“नको. खरंच... मीरावहिनी, मी एकदा मोहितदादांशी बोलू? त्यांचा जो काही राग आहे तो...”
“तो राग संताप मला पूर्णपणे मान्य आहे. तू बोलून काय फायदा आहे, सांग? माझं चुकलंय. गेली पंधरा वर्षं चुकत होतं हे मला माहितच आहे. मी त्यांच्याशी खोटं बोलायला नको हवं होतं. तेव्हाच खरं काय ते सांगितलं असतं तर... तर कदाचित जे आज घडतंय तेच तेव्हाही घडलं असतं. आताही मला माहेरी पाठवायचा विचार चालू आहेच. तेव्हाच पाठवलं असतं. अताही मी फसवणारी, कुल्टा, नालायक बाई ठरलेच आहे. तेव्हाही ठरले असते. कशासाठी मी हे लपवून ठेवलं तेच समजत नाही. ते जे काही देतील ती शिक्षा मला कबूल असेल. घर सोडून जा म्हणाले तर एका क्षणाचाही विलंब न करता बाहेर पडेन. जीव दे म्हणाले तर तेही करेन... पण आता खरंच बास झालं हे दुहेरी आयुष्य. आता मी काहीही न लपवता काहीही खोटं न बोलता स्पष्टपणे स्वत:शीच आणि जगाशी कबूल करून टाकते. माझं असिफवर प्रेम आहे. मला असिफ हवा आहे. हे म्हटल्यामुळं, असं वागल्यामुळं जर मी वाईट ठरत असेन, मी नालायक ठरत असेल तर तेच ठिक. तसंही मी इतके दिवस जगापासून लपवून ठेवलं तरी काय झालं ते तू पाहिलंस...”
“मीरावहीनी, त्याचा खरंच असा गैरसमज झाला होता की....”
“गैरसमज नाही. माही, त्याला ठाम विश्वास होता की मीच तुमच्यामध्ये येतेय. मीच व्हिलन असणार याची त्याला जबरदस्त खात्री होती. तू घर सोडून गेली होतीस तेव्हा मी त्याला भेटले, माझ्या मनांत काय आहे ते स्पष्ट सांगितलं, तर मला म्हणाला की, मला फक्त ईझी वे हवा असतो. मग काय करायला हवं होतं? तरूणपणाच्या उंबरठ्यावर तो मला आवडला. आजही आवडतो. मला तो हवा झाला. आजही हवा आहे. माझ्या मनामध्ये ही इच्छा असणं म्हणजे मीच वाईट आहे. मीच व्यभिचारी आहे..”
“असं कुणीह्च म्हटलेलं नाही.... पण तुम्ही ही गोष्ट मला आधी का नाही सांगितलीत? इतके दिवस आपण बोलतोय, मी तुम्हाला खरं सांगितल्यावर... तेव्हा तरी काय ते सांगायचं. मला इतक्या दिवसांत कधीच जाणवलं नाही... की तुम्ही..”
“... पाहिलंस, मी किती उत्तम अभिनेत्री आहे. तू पहिल्यांदा घरी आलीस आणि असिफचं नाव घेतलंस तेव्हाच मला समजलं होतं. पण तुला काय सांगणार होते? मी असिफला आधीपासून ओळखते. त्याच्यावर प्रेम करत होते. आम्ही लग्न केलं होतं. तेव्हा मला सर्वात जास्त भिती होती की असिफ यांना काहीतरी म्हणेल. माही, मी तुझ्याइतकी किंवा असिफइतकी हुशार नाही. तू तर किती शिकलीस, असिफलाही संधी मिळाली असती तर... मला साधं बी ए पास करणं जमलं नाही... माझ्यात तेवढी अक्कलच नाही. तितकी चलाखीपण नाही. तेवढ्या लांबचा विचार मी नाही करू शकत. मी खोटं बोलले.. मी गोष्टी लपवून ठेवल्या. पण मी व्यभिचारी आहे का? मी असिफवर प्रेम करते. मला तो हवा आहे. पण माझं लग्न मोहितसोबत झालंय. त्याच्यासोबत मी कायम प्रामाणिक राहिले. माझं असिफवर प्रेम असतानासुद्धा... मोहितवर पण केलं ते प्रेमच होतं ना? त्यामध्ये काय खोटं आहे? आज मोहित मला म्हणतो की तू मला समजलीच नाहीस.. मी तरी मला स्वत:ला कुठं समजलेय? फक्त आता सगळे म्हणतात म्हणून मीपण म्हणते. हो, मी खरंच खोटारडी आहे. फार वाईट आहे. एका र्थानं झालं ते चांगलंच झाल. आता सगळ्यांना सगळं माहित आहे. कुणाशीच काही खोटं बोलायची गरज नाही. आता मोकळेपणानं श्वास घेऊन म्हणू शकते.. माझं असिफवर प्रेम आहे.. अगदी तुझ्यासमोरसुद्धा”
“खरंच इतकं प्रेम करता....”
“फक्त प्रेम करते. ते निभवण्याची हिंमत नाही... एकदाच हिंमत केली, असिफला लग्नासाठी तयार करून.. किती विनवलं, किती मिनत्या केल्या.. तीच हिंमत आयुष्यभर दाखवली असती... पण घाबरले. असिफला असं वाटतं की मी फक्त फिजिकल लेव्हलवर प्रेम केलं. असं वेगळं काढता येतं का.. फिजिकल लेव्हलवरचं प्रेम आणी इमोशनल लेव्हलवरचं प्रेम... असं वेगवेगळं असतं का?”
“मला आजवर कधी माहितच नाही. एखादी व्यक्ती “हवी असणं” म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे काय.. तेरा वर्षाची होते, प्रेम वगैरे विषय फक्त सिनेमामधले.... चन्नाम्माचा एक चुलत भाऊ घरी आला होता, त्या रात्री पहिल्यांदा तो घाणेरडा अनुभव घेतला. या सेक्सचा आणि प्रेमाचा काही संबंध असू शकतो हेच मला खूप वर्षांनी समजलं. चन्नाम्मानं मला बंगलोरला पाठवलं, तेव्हा हे रोजच चालू झालं. डोक्यामध्ये एक गोष्ट क्लीअर कट बसली होती, हेच जगणं असतं. याहून दुसरं काही असूच शकत नाही. यामध्ये आपण एंजॉय करण्यासारखं काही नसतं. आपण फक्त सहन करायचं. जेव्हा सहन होत नाही, तेव्हा नशा करायची, कसलीही... पण असंच जगायचं. माझी कहाणी तिथंच संपली असती जर असिफ भेटला नसता...”
“पण तुला असिफ भेटला ना...”
“हो, काहीतरी मागच्या जन्माची पुण्य़ाई म्हणून. त्याला त्याचं एक स्वप्न पूर्ण करायचं होतं. खूप शिकण्याचं. त्याच्यासाठी मी ते स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी त्यानं मला विकत घेतलं. अजून दुसरा कुठलाही मार्ग नाही..विकत घेणं. बाजारात जाऊन वस्तू घेतात तसं, मी त्याच्यासाठी एक वस्तू होते.”
“तू असिफबद्दल इतक्या कडवटपणे का बोलतेस?”
“कडवटपणे नाही. खरं तेच सांगतेय. मी असिफच्या प्रेमात पडले नाही. माझ्याकडे दुसरा कुठलाही रस्ताच नाही. त्याच्याशिवाय कुठं जाण्याचा. आज एवढं शिकल्यावर.. स्वत:च्या पायावर उभं राहिल्यावरसुद्धा. असिफकडे दुसरा रस्ता आहे. त्याला सोयिस्करपणे त्याच्या भूतकाळाविषयी, रेश्माविषयी बोलता येऊ शकतं. मला नाही. मी तो भूतकाळ कधीच घडला नाही, असं समजून जगायचं आहे. पण कसं विसरणार? तो काळ मी कसं विसरू शकेन... हे आजवर असिफ कधीच समजून घेत नाही. मग मी चिडते. छोट्याछोट्या गोष्टीमध्ये हट्ट करून मलादेखील काहीतरी स्वतंत्र अस्तित्व आहे हे दाखवायचा प्रयत्न करत राहते. पण सत्य आम्हा दोघांनाही माहित आहे... असिफशिवाय मला अस्तित्व नाही. असिफ मला हवा की नाही असा प्रश्नच माझ्यासमोर येऊ शकत नाही. आय ऍम सपोज्ड टू लव्ह हिम.”
“माही, असिफनं तुझ्यावर कधी जबरदस्ती वगैरे?”
“कधीच नाही. आजवर नाही. आम्ही एकत्र रहायला लागलो तेव्हा तर पहिले सहा महिने त्यानं मी घरात आहे की नाही याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. मी कंफर्टेबल व्हावं म्हणून.. पण तो कितीही चांगला वागला, कितीही परफेक्ट असलातरी तो माझा स्वत:हून निवडलेला ऑप्शन नाही हे खरं.. तुम्ही जसं त्याच्यावर... त्याच्या निव्वळ असण्यावर, त्याच्या कल्पनेवर प्रेम करू शकता तसं मी कधीच केलं नाही. कुणावरही. उद्या जर माझ्या आयुष्यात असिफ नसेल तर मी जगूच शकणार नाही. कारण, मला जगणंच माहित नाही. मी कालही असिफच्य सहाय्यानं जगणारं बांडगूळ होते, आजही आहे, उद्याही राहीन. मी काय बडबडतेय मलाही समजत नाही... पण जेव्हापासून मला हे तुमच्या दोघांबद्दल समजलंय तेव्हापासून माझं अख्खं नातंच डळमळलंय.. मला त्यानं सांगितलं नाही... कारण, त्याला ते सांगावंसं वाटलं नाही. इट वॉज नन ऑफ माय बिझनेस. जर हे प्रकरण इतकं क्षुल्लक होतं तर कुठल्या अधिकारानं त्यानं येऊन तुमच्यावर हात उगारला? काहीतरी हक्क होता म्हणूनच ना...मग जर हा हक्क मनात कुठंतरी होता... तर इतके दिवस कशाला नाटकं केली, जे होतं ते माझ्यासमोर कबूल करायचं होतं. चिडले असते, रडले असते... कदाचित त्याच्या जखमा भळभळलेल्या बघून परत त्याच्यावर इतकंच तुटून प्रेम करत राहिले असते. पण आज त्याचा जो राग येतोय.. तसा राग तर आला नसता. कुठल्याही नात्यामध्ये सर्वात वाईट काय असतं समोरच्याला गृहित धरलं जाणं. असिफनं हे माझ्याबाबतीत केलंय आणि तुमच्याबाबतीतसुद्धा”
“मला असिफनं जितकं गृहित धरलं तितकंच मी पण त्याला गृहित धरलं ना? हे लग्न वगैरे तो इतकं मनाला लावून घेईल असं कधी वाटलंच नव्हतं. त्याचा स्वभाव इतका चांगला माहित असूनही. पण मी खोटं बोलले नसते तर माझ्या आईबापांनी त्याचा आणि माझा दोघांचाही मुडदा पाडला असता... मी लग्नाला तयार झाले नसते तर बाबांनी असिफचं आयुष्य संपवलं असतं.. ही गोष्ट त्यानं आजवर लक्षात घेतलेली नाही. बाबांकडे त्यानं पैसे मागितले होते. मला सोडायची किंमत म्हणून.. त्याच रात्री असिफला संपवायचे बेत चालू होते. मला ते समजल्यावर मी अजून एक खोटं बोलले. आईला सांगितलं असिफचं मूल आहे. त्याला गावाबाहेर जाऊ द्या, मी मूल पाडायला तयार होइन. अन्यथा नाही... सुदैवानं तालुक्याला ऍबॉर्शनसाठी नेऊन हे खोटं आहे समजलं तोपर्यंत असिफ निघून गेला होता. त्या दिवसापासून स्वत:शी, सगळ्यांशी खोटंच बोलत राहिले. मोहितला खरं सांगण्यासाठी खूप धीर गोळा केला होता, पण कधीच जमलं नाही. मनामध्ये असिफवर प्रेम करत राहिले. पण एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून, एक आई म्हणून कसल्याही कर्तव्यामध्ये कसूर केली नाही...तरीही आज माझंच चुकलंय. आयुष्य संपवायचे विचार पण येतात पण मुलांपायी जीव अडकलाय. त्यांना माझ्याशिवाय कोण करणार?”
माहीनं पुढं येऊन रेश्माचे डोळे पुसले. “प्लीज असं कहीतरी बोलू नका. मला तुमची अवस्था चांगली समजतेय.. आणि तुमचं काहीही चुकलेलं नाही. चूक असलीच तर ती नशीबाची आहे. मलापण हेच घर घ्यावंसं वाटलं, आणि असिफच्या मनात नसताना त्यानं केवळ माझ्या हट्टाखातर....”
“नशीबाचे खेळ असतात... असो. किती चर्चा केली तरी हा विषय संपण्यासारखा नाही... पण एका अर्थानं जे झालं ते बरंच झालं. मी कदाचित माहेरी जाईन. या सर्वांची सुरूवात तिथून झाली होती.. आईवडलांच्या सामाजिक प्रतिष्ठेपायी, त्यांच्या इज्जतीपायी. अता मी माघारी गेल्यावर त्यांची ती इज्जत तशीही धुळीला मिळणार आहे. मुलांचाच प्रश्न आहे... तशी दोघं मोठी आहेत.. सांभाळतील स्वत:ला.. तू मात्र व्यवस्थित रहा. स्वत:ची काळजी घे.. असिफची काळजी घे. त्याच्यासारखा माणूस मिळणं फार भाग्याचं असतं”
“मीरावहिनी, तुम्ही घातलेली शपथ मोडा ना, एकदा मला असिफला सांगू देत.. मी याहीवेळेला हे बाळ पाडणार होते.. मागच्या दोन वेळेसारखं. घाबरले होते. कितीहीवेळा म्हणाला असला तरी प्रत्यक्षात असिफनं ही जबाबदारी घेतली नसती तर... तुम्ही मला थांबवलंत. किमान मी त्याला सांगावं म्हणून तुम्ही माझी समजूत घातलीत.. आज असिफ बाप होण्याच्या कल्पनेनंसुद्धा खुश आहे.. त्यामागे खरं कारण तुम्ही आहात.”
“त्यानं काय होइल? मी अचानक व्हिलनची हीरो होईन. शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार होइल? मी काही फार ग्रेट काम केलेलं नाही. माझ्या असिफचं मूल तू पाडणार ही कल्पनाच मला असह्य करून गेली. म्हणून मी तुला इतकं समजावलं वगैरे... मी फार स्वार्थी आहे गं.. उगाच कुठून तरी मला महान दाखवायचा प्रयत्न करू नकोस. खुश रहा. आनंदी रहा. इतकं टेन्शन घेऊ नकोस. आणि असिफ माझ्याशी जे काही वागलाय त्यासाठी त्याला माफ कर. माझ्या गुन्ह्यांकडे पाहता त्याची चूक फार छॊटी आहे...”
माहीचा मोबाईल वाजला. “असिफचा मेसेज. पाच मिनिटांत घरी पोचतोय. काही आणायचं का..” तिनं लगेच “काही नको” म्हणून उत्तर पाठवून दिलं.
लगेच गडबडीनं ती उठली.. “मी येते मीरावहिनी. उगाच..”
“उगाच इथं बघून चिडेल..” रेश्मानं उठून दरवाजा उघडला. “आज आलीस तेवढंच बरं वाटलं. किमान तुझ्या मनातला राग तरी गेला हे बघून...काळजी घे.”
“तुम्हीपण. एकदा मोहितदादांशी मोकळेपणानं बोला. सगळं ठिक होइल”
“नाही, इतके दिवस सर्व ठिक होतं, आता सगळं विस्कटलंय” रेश्मा हसून म्हणाली.
(क्रमश: )


दरवाजा (भाग 9)

Friday, 7 November 2014

दरवाजा भाग 7

माही उठून किचनजवळ आली. असिफ ब्रेकफ़ास्टची तयारी करत होता. “गूड मॉर्निंग.” तिला बघताच तो म्हणाला. “बरं वाटतंय?”


माहीनं नुसती मान हलवली, काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडणार, इतक्यात थांबली आणि तोंडावर हात धरून बाथरूमकडे पळाली. ते पाहून असिफने कपाळावर हात मारून घेतला आणि दूध ठेवलेला गॅस बंद करून किचनची ओट्याजवळची खिडकी उघडली. थोडयावेळानं हॉलमध्ये सोफ्यावर डोकं टेकून बसलेल्या माहीच्या हातात चहाचा कप देत त्यानं  परत एकदा  विचारलं. “बरं वाटतंय?” 


“असिफ, चहा नको” तिनं कप खाली ठेवत म्हटलं. “आता काहीच नको” 


“ज्युस घेतेस का? लिंबूपाणी?” त्यानं हलकंच तिच्या केसांतून हात फिरवत म्हटलं. “डॉक्टरकडे जाऊन यायचं का?” 


माहीनं परत नुसती मान हलवली, “दोन दिवसांपूर्वी तर जाऊन आलोय. परत कशाला?”


“हा डॉक्टर पण ग्रेट आहे, काही विचारलं तरी “हे नॉर्मलच आहे” एवढं एक उत्तर देतोय. मी थोड्यावेळानं शैलजाला फोन करतो, आपण तिच्याकडे जाऊ..” त्यानं किचनमधून सरबताचा ग्लास आणून तिच्या हातात दिला. 
“मी फोन केला होता. त्या म्हणाल्या की मॉर्निंग सिकनेस हळूहळू कमी होइल”


“मॉर्निंग? दिवसातले चोवीस तास ओकूबोकू करतेस... आणि शैलजाला सांग. मला काही प्रेग्नन्सीमधला जास्त अनुभव नाही, पण तरी... आता काहीही हळूहळू कमी होणार नाही, जे आहे ते वाढतच जाणार आहे” असिफ हळूच म्हणाला, माहीनं त्याला एक फटका मारला, “काहीही फालतू जोक्स मारू नकोस. तुला शोभत नाहीत”


“पण सीरीयसली, दूध उकळायच्या वासानं एखद्याला इतका त्रास होतो हे मी पहिल्यांदाच बघतोय..”


“नको रे बोलूस त्या वासाबद्दल, मला परत मळमळेल.... प्लीज” माही वैतागून म्हणाली. “हे प्रेग्नन्सी वगैरे इतकं कठीण असेल असं कधी वाटलं नव्हतं. आय जस्ट हेट मायसेल्फ! ऑफिसमध्ये पण सगळे हसतात.”


“मी सांगितलं होतं या फंदात पडायला? तुलाच हौस आहे, मग निस्तरा.” पुन्हा एकदा माहीनं त्याला फटका मारला. “आता गप्प बैस, नाहीतर अजून मारेन”


“एवढी मारामारी करू नकोस. नाहीतर ते होणारं साऊथ इंडियन ऍक्शन सिनेमामधल्या हीरोंसारखं अतरंगी व्हायचं.” असिफ परत तिला चिडवत म्हणायचा. “चलो! कामं आहेत. तुम्हाला काय हक्काची रविवारची सुट्टी आहे, आम्हाला शूटिंगवर जायचंय..”

“दुपारनंतर जाणार आहेस ना?” 

“हो, पण त्याअधी घर साफ करायचं आहे, तुम्हाला फिनाईलच्या वासानं उलटी होते. मग स्वयंपाक करायचाय, तुम्हाला फोडणीच्या वासानं मळमळतं, मग कपडे वॉशिंग मशिनला लावायचेत, तुम्हाला साबणाच्या वासानं...”

“बास!!” माही चिडून म्हणाली. “समजलं. तुला माझ्यामुळं फार काम करावी लागतात.” असिफ हसला. “आराम कर. जेवण बाहेरून मागवतो.” माही टीव्हीवरचं कसलंतरी चॅनल लावून बसली. थोड्या वेळानं असिफची कुणाशीतरी मोबाईलवर चाललेली तणातणी ऐकू आल्यावर तिनं टीव्हीचा आवाज बंद केला. असिफ धुसमुसत बाहेर आला आणि चिडून हातातला मोबाईल फेकून दिला. “साला हरामखोर” तो ओरडला. 


“काय झालं? एवढा कुणावर वैतागतोस?”


“हा डीसूझा वेडा झालाय. त्याला मी मागच्या महिन्यांत सांगितलं होतं... मागच्या महिन्यात!!! यापुढे मी कुठलाही मोठा प्रोजेक्ट घेणार नाही, तर यानं माझ्या नकळत त्या एवी ईव्हेंटवाल्याला कमिट केलंय. आता म्हणे माझ्या शब्दाखातर हे काम तू करून दे. किमान महिनाभराची कसल्या कसल्या लोकांची वर्ल्ड टूर आहे. मी स्टेज डीझाईन करणार इतपत ठिक आहे, पण स्टेज मेण्टेनन्सला परत मीच हवाय. आता काय तिथं सुतारगिरी करू? लोकं परस्पर असले निर्णय घेतात ना. वैताग येतो.”


“टूर कधीपासून आहे?”


“अजून सहा महिन्यांनी.” 


“तोपर्यंत माझी डीलीव्हरी झालेली असेल. तुला महिनाभर जायला काहीच प्रॉब्लेम नाही. मी मॅनेज करू शकेन.”
“पण मलाच जायचं नाहीये ना... मी आता हातातले प्रोजेक्ट संपल्यावर एकही काम घेणार नाही. किमान वर्षभर तरी. घरबसल्या डीझाईनिंग असेल तर ठिक, नाहीतर नकोच..”


“हा तुझा हट्ट मला अजूनही समजत नाही. मी स्वत: डीलीव्हरीनंतर तीनेक महिन्यांनी ऑफिसला जाणार आहे.वर्षभर घरात बसले तर वेडी होइन. तोपर्यंत एखाद चांगली बेबीसीटर बघून घेऊ. मग...”


“कशाला? मी वर्षभर सांभाळेन. नंतर तुला ऑफिसमध्येच एक नर्सरीरूम बनवून देईन. तिथं सगळं परफेक्ट करून देईन. हवंच असेल मदत म्हणून बेबीसीटर घेऊ, पण मला वर्षभर काम करायचं नाही या निर्णयावर मात्र मी ठाम आहे”


“कशासाठी?”


असिफ माहीच्या बाजूला येऊन बसला. “कारण, आता मला स्वत:ला विश्रांती हवीय. माही, मला असा एकही दिवस आठवत नाही जेव्हा मी काम करत नसेन. आयुष्यात नक्की कधी कामाला सुरूवात केली तेच माहित नाही. जेव्हापासून जगतोय, तेव्हापासून धावतोय. आता कंटाळलोय. थांबावंसं वाटतंय. आतापर्यंत घेतलेला कुठलाही निर्णय माझ्या मतानं किंवा आवडीनं घेतलेला नव्हता. सर्व काही केलं ते मजबूरी म्हणूनच. आपखुशी म्हणून काहीच नाही. आता जरा हातात पैसा आहे, निवांतपणा आहे.... तर एक ब्रेक घेऊ देत ना.. मला वडील कसे असतात ते माहित नाहीच, किमान माझ्या बाळाला तरी समजू देत. त्याच्यासाठी भरपूर वेळ देता येऊ शकतोय, तर काय प्रॉब्लेम आहे?”


माहीनं त्याचा हात हातात घेतला. “असिफ, एकावर्षात बारा महिने असतात. एका महिन्यात तीस दिवस आणि प्रत्येक दिवसात चोवीस तास. वर्षभर ब्रेक घेतो हे म्हणणं सोपं आहे, पण एका दिवसाचे चोवीस तास घरामध्ये बसणं तुझ्यासाठी अशक्य आहे. मी तुला आज ओळखत नाही. तरी तुला ब्रेक घ्यायचाच असला तर घे.. मला काहीच प्रॉब्लेम नाही. होण्य़ासारखे छोटे प्रोजेक्ट्स करत रहा. फार मोठी हेक्टिक कामं घेऊ नकोस. सिम्पल. नंतर मला कंटाळा आलाय हा जप ऐकवू नकोस!”


“नाही ऐकवणार.... मी आणि माझं बाळ मिळून....” असिफ बोलत होता तितक्याच दरवाज्याची बेल वाजली. “गीता एवढ्या लवकर आली?” माही घड्याळांत बघत म्हणाली. 


असिफनं उठून दरवाजा उघडला तर गीताऐवजी कोण भलतीच चार पाच माणसं उभी होती. “नमस्कार” 
त्यामधल्या एका वयस्कर काकांनी हसत ओळख करून दिली. “मी मिस्टर शशिकांत सुर्वे. आपल्या सोसायटीचा चेअरमन”


“ओह. आत या ना...” असिफ म्हणाला. सगळे पाच जण आत हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. सोसायटीच्या या ना त्या कामाच्या निमित्तानं माही त्यापैकी बहुतेकांना ओळखत होती. आतापण कसलीतरी देणगी, वर्गणी मागायला वगैरे आले असावेत असं तिला वाटलं. पण एकंदरीत सर्वांचा अविर्भाव फारच गंभीर आणि शांत वाटत होता. त्यापैकी आलेल्या भुरे वहिनी आणि केतकरवहिनींनी माहीच्या वाढलेल्या पोटाकडे बघून केलेली नेत्रपल्लवी तिच्या चांगलीच लक्षात आली होती. 



“आम्ही म्हटलं, आज रविवार. तुम्ही घरी असाल म्हणून मुद्दाम आलो. माही मॅडम भेटतात, अधूनमधून. पण वर्ष झालं आजवर आपली भेट अशी झालीच नाही” सुर्वे परत एकदा म्हणाले. 


“काय करणार. कामाच्या काही निश्चित वेळा नाहीत. त्यामुळं...”


“नक्की काय काम करता आपण?” त्याचं बोलणं मधेच तोडत एक म्हातारेसे आजोबा म्हणाले. “काही चित्रपटामध्ये वगैरे आहे ना?” एकंदरीत त्यांचं बोलणं फारच शिष्टपणाचं वाटलं तरी असिफ शांतपणे म्हणाला. “मी सेट डीझायनर आहे. चित्रपट किंवा मालिकांसाठी जे मोठे मोठे सेट लागतात ते बनवून देतो. गेली बारा तेरा वर्ष झाली याच क्षेत्रात आहे...”

“बरं बरं” ते आजोबा उगाच त्याचं बोलणं थांबवत म्हणाले. 

“कितवा महिना चालू आहे गं?” भुरे वहिनींनी माहीला अचानक विचारलं. 

“पाचवा संपेल, पुढल्या आठवड्यात” ती म्हणाली. 

“पहिलंच आहे ना?” केतकरवहिनींनी विचारलं. यावर काय बोलायचं ते न सुचल्यानं माहीनं असिफकडे पाहिलं. “हो! पहिलंच.” तो शांतपणे म्हणाला. 


“मी जरा चहापाणी बघते...” म्हणून माही आत निघून गेली. 


“चहा वगैरे नको गं... पाणी आण. थंड नको” भुरे वहिनींनी आवाज दिला. माही आतमधून पाण्याचे, सरबताचे ग्लास वगैरे घेऊन येईपर्यंत कुणीच काही बोललं नाही. ट्रे ठेवून माही निघून बेडरूममध्ये गेली. असिफ शांतपणे या अवचित आलेल्या लोकांकडे बघत उभा राहिला. ते पाचहीजण आपापसामध्ये नजरानजर करून “तू बोल तू बोल” करत असल्याचं त्याला लक्षात आलं. 


शेवटी मघासचे खडूस आजोबांनीच विषय काढला. “तुमच्या मिसेस नक्की काय काम करतात?”


“त्यांचं वाशीला ऑफिस आहे. कॉल सेंटर टाईप. मला टेक्निकल डीटेल्स जास्त समजत नाही, पण बेसिकली काहीतरी आय टी रिलेटेड आहे. जास्त माहिती तुम्ही तिलाच विचारा” 


“नाही, त्याची काही गरज नाही. त्यांना आराम करू द्या. तुमचं लग्न कधी झालं?” आजोबांनी पुढचा प्रश्न टाकला. एका झटक्यात असिफला नक्की काय चाललंय ते समजलं. त्याच्या डोळ्यामध्ये संतापाची एकच लाट उसळून गेली. दुसर्‍याच क्षणी त्यानं स्वत:ला सावरलं. “दहा वर्षापूर्वी” तो आधीच्याच शांतपणे म्हणाला. 

“माफ करा, पण आम्हाला असं समजलंय की तुमचं लग्न झालेलं नाही...” आजोबा पुन्हा एकदा ठामपणे म्हणाले. 
“कुणी सांगितलं?” असिफनं त्याच सुरात विचारलं. 


“कुणीही सांगू देत... पण हे बघा, ही सभ्य मध्यमवर्गीय लोकांची सोसायटी आहे. इथं आम्ही शक्यतो अशीच लोकं ठेवतो. तुम्ही हा फ्लॅट विकत घेतलात तेव्हा तुम्ही फिल्मी धंद्यामध्ये आहात किंवा तुमची मैत्रीण रात्री अपरात्री घराबाहेर हिंडते हे तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं” आजोबा पुन्हा एकदा गरजले.


“मैत्रीण? अहो, ती माझी लाईफ पार्टनर आहे. बायको!!! आणि ती घराबाहेर कुठेही हिंडत नाही. एम बी ए शिकलेली आहे. तिच्या नावावर एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. प्रॉपर लीजवर घेतलेलं ऑफिस आहे. मीपण माझा व्यवसाय तेव्हा स्पष्टपणे लिहिलेला होता. माहीबद्दलही....”


“आजकाल कुणीही काहीही खोटं लिहून देतं. आमच्या भावाच्या सोसायटीमध्ये नाही... चार पाच युपीकडच्या मुली रहायला आल्या, स्टुडंट आहेत म्हणून. नंतर समजले त्यांचे धंदे.” भुरे वहिनी मध्ये बडबड्ल्या. 


असिफ शांतपणे म्हणाला, “आता तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे सांगा”


“आम्हाला असं समजलंय की तुमचं लग्न झालेलं नाही. तुम्ही बिनालग्नाचे एकत्र राहताय...” सुर्वे थोडं बिचकतच म्हणाले. “म्हणून जरा.... काय आहे.. शेवटी लोकं बोलतात ते चांगलं वाटत नाही..”


पण आजोबा ऐकायच्या मन:स्थितीमध्ये नव्हते. “गुळमुळीतपणे बोलू नका! हे बघ. ती आता सध्य काय करते याचा काथ्याकूट करण्यामध्ये अर्थ नाही. तिचं चालचलन पूर्वी ठिक नव्हतं असंही ऐकू येतंय. सोसायटीमध्ये हे गॉसिप खूप दिवसांपासून चालू आहे. हे जर खरं असलं तर..”



सुर्वेनं हातानंच आजोबांना थांबवलं. “आम्हाला जस्ट विचारायचं आहे, खात्री करण्यासाठी.. किंवा तसं काही नसेल तर जाणून घेण्यासाठी...”


“ओके! तुम्हाला लग्न म्हणजे काय अभिप्रेत आहे? आमचं लग्न चारचौघांसारखं झालं नाही हे मान्य... तुम्ही सगळे एक मिनिट इथं बसाल का? मी आलोच....” म्हणून असिफ बेडरूममध्ये आला. बेडवर बसलेल्या माहीनं भेदरून त्याच्याकडे पाहिलं. “हे काय चालू आहे?” ती हळूच म्हणाली. 


“माहित नाही. तुला या विषयावर बिल्डींगमध्ये कुणी काय बोललंय?” माहीनं नकारार्थी मान हलवली. “डोण्ट वरी,” हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवून असिफ म्हणाला. “तू घाबरू नकोस. हे लोक जाईपर्यंत अजिबात बाहेर येऊ नकोस, आय विल हॅन्डल देम.” म्हणत असिफने कपाटामधून एक ब्रीफकेस काढली. “तुझ्या सर्टीफिकेट्सची फाईल दे. या लोकांना तोंडावर फेकून सांगतो... दहा खर्‍यामध्ये एक खोटं कसंही खपेल” म्हणून त्यानं त्या ब्रीफकेसमधून एक लॅमिनीटेड कागद काढला. 


“हे काय आहे?” माहीनं विचारलं. असिफनं तो कागद तिच्या हातात दिला. “मॅरेज सर्टिफिकेट? कसं काय... आणि हे इतकं जुनं?” माहीनं आश्चर्यानं विचारलं. 


“माहीमॅडम, तुमचा नवरा फिल्मी धंद्यात आहे, जिथं मी महिन्याभरामध्ये लाल किल्ल्याचा खोटा सेट उभारू शकतो, गरज लागली तर करोडो रूपयाच्या खोट्या नोटा आणू शकतो. तिथं एक खोटं मॅरेज सर्टीफिकेट बनवून ठेवायला किती वेळ लागला असता? तू माझ्यासोबत रहायला आलीस तेव्हाच बनवलं होतं. इन केस कुठं लागलंच तर.. पण आज वापरायची वेळ आली. बाहेर बसलेल्या एकाही गाढवाला ते खोटं आहे हे समजणार नाही” तो हळूच कुजबुजला. 


माही अविश्वासानं त्या कागदाकडे पाहत राहिली. “हेच मी तुला खरं रजिस्टर मॅरेज करायला सांगत असते तेव्हा...”

“श्श!! तो वेगळ्या भांडणाचा विषय... निवांत भांडू” म्हणून असिफनं ते सगळे कागद घेतले आणि तो बाहेर हॉलमध्ये गेला. 


“हे माझ्या लग्नाचं रेकॉर्ड.... आमचं अक्षता टाकून आणि वाजंत्र्या वाजवून लग्न झालं नाही. मी आणि माहीनं रजिस्टर लग्न केलं. दोघांपैकी कुणालाही विधीवर लग्नामध्ये इंटरेस्ट नव्हता. पण हा कागद मात्र आहे. या रेकॉर्डमुळे आमचं लग्न झालंच नाही आणि आम्ही बिनालग्नाचे आहोत, हा तुमचा आरोप संपला. आता तुमचा दुसरा आरोप जो खरोखर खूप भयंकर आणि बदनामीकारक आहे. माहीच्या... माझ्या पत्नीच्या चालचलनाचा. मला आज इथं माझी पत्नी रात्री बाहेर कामाला का जाते या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल असं आजवर कधी वाटलं नव्हतं...”


“आम्हाला पण ज्यांनी सांगितलंय त्यांनी खात्रीपूर्वकच सांगितलंय.  हे... ती रात्री...तिचं शिक्षणसुद्धा... ”

“धंदा करायला बाहेर पडते? आणि मी माझ्या बायकोला विकून तिचे पैसे खातो... हे ज्यानं कुणी सांगितलंय त्याला माझ्यासमोर घेऊन या” असिफ एकदम चिडून म्हणाला. 


सुर्वे एकदम बिचकला. “अहो, असं आम्ही कुठं म्हणतोय. फक्त ते रात्रीचं रोज रोज... म्हणजे सोसायटीमध्ये चर्चा होते हो...”


“हो? सोसायटीमध्ये चर्चा होते? नक्की कशाची? शिक्षण माहीचं नव्हे, माझं अर्धवट आहे. मी तिच्यापेक्षा कमी शिकलेला आहे. खोटं वाटतंय? ही सर्टिफिकेट्स. माहीच्या कॉलेजची. दहावीपर्यंत तमिळनाडू, मग बारावी बंगलोर आणि डिग्री- एम बी ए इथं मुंबईत.” असिफ हातातले कागद भिरकावत म्हणाला. “या फोटो कॉपीज आहेत. प्रत्येकानं एकेक घ्या आणि वाचा. माही एम. बी. ए.ला युनिव्हर्सिटी टॉपर आहे. दोन वर्षं यु एसमध्ये काम करत होती. आणि हे लेटर्स तिनं आजवर जिथं कुठे नोकरी केली त्याचे.... हे कागद खोटे वाट्त असतील तर या सर्व ऑफिसमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊन चौकशी करायला तुम्ही मुक्त आहात. सोसायटीमध्ये जे कोण बोलत असतील त्यांनाही हेच सांगा. तीन वर्षापूर्वी कर्ज काढून तिनं हा सेटप चालू केला आहे. ही त्या कर्जाची कागदपत्रं. तिच्या ऑफिसमध्ये आता या घडीला चाळीसहून जास्त लोकं काम करतात. त्या सर्वांचे कॉन्टॅक्ट डीटेल्स हवे असतील तर मी देइन. त्यांच्या घरी जाऊन चौकशी करू शकता. खरंतर कसल्याही स्पष्टीकरणाला मी अथवा माही बांधील नाही. आम्ही हा फ्लॅट आमच्या पैशानं घेतलाय, या चार भिंतीच्या आत आम्ही काय करतो हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. याउप्पर तुम्हाला काही आरोप करायचे असतील. सोसायटीचे चेअरमन या नात्यानं.. अजून काही आक्षेप असतील तर मला ते लेखी लिहून द्या. त्यावर काय कार्यवाही करायची ते मी करेन”



“हे बघा, तुम्ही या घटनेला विनाकारण वेगळं वळण देत आहात. आम्हाला फक्त खातरजमा करून घ्यायची होती. सभ्य लोकांच्या...”


“कोण सभ्य आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. सोसायटीमध्ये जर गॉसिप होत असेल तर ते कोण करतंय हेही समजतंय.” असिफ भुरेवहिनी आणि केतकरवहिनींकडे बघत म्हणाला. “मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगून झालंय. तुम्हाला अजून काही खातरजमा करायची असेल तर...”


“कुटूंब?” भुरेवहिनी मध्येच म्हणाल्या. “तुमच्या दोघांच्या कुटूंबामध्ये कोणच का नाही? वर्ष झालं तुम्हाला इथं येऊन.. तुमच्या घरामधलं इतर कुणीच का दिसत नाही?”


“माहीचं कुटुंब तमिळनाडूमध्ये आहे. तिची सावत्र आई... आणि दोन भाऊ. त्यांची तिथंच शेती वगैरे आहे. तिचे वडील आता तीन वर्षापूर्वी गेले. गावाचा पत्ता आणि फोन नंबर हवा असेल तर देऊ का? माझी आई दहा वर्षापूर्वी गेली. वडील मी खूप लहान असताना. एक मामेभाऊ इथं मुंबईमध्ये आहे, पण त्याच्याकडे फारसं जाणंयेणं नाही.. अजून एक बहिण आहे. डॉक्टर शैलजा, तिचा सायनला दवाखाना आहे. माहीच्या बाळंतपणाला तीच इथं येणार आहे, तेव्हा तुमची ओळख करून देईन.” 


बेडरूममध्ये बसलेली माही भितीनं थरथरत होती. इतक्या दिवसांमध्ये कुणाला आपल्या भूतकाळाविषयी समजलं तर काय असा प्रश्न कधी आलाच नव्हता. असिफनं आणि तिनं कधीचाच तो विषय आयुष्यामधून वजा केला होता. असिफ कायम सांगायचा, “आपण त्याबद्दल बोलायचंदेखील नाही... जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती.” उलट तिनंच कधी भांडताना वगैरे असा काही उल्लेख केला की तो प्रचंड दुखवायचा. चिडायचा. 
सोसायटीमध्ये तिच्या नावाचं काही चर्चा चालू असलेली तिला खरंच माहित नव्हती. एक  समोर राहणारी मीरा सोडल्यास इतर कुणाशीही तिचं फारसं बोलणं नसायचंच. मीरा कुणासोबत गॉसिप वगैरे करण्यासारखी नव्हती, उलट माहीला तिच्याबद्दल कायम आश्चर्य वाटायचं. मुलं-नवरा-घर एव्ढंच तिचं विश्व कसं काय असू शकतं. बाहेर असिफ शांतपणे बोलत होता. सुर्वे आणि ते आजोबाच मधे काहीतरी बोलले, दोन्ही बायकांचा आवाज गप्पच झाला होता. 


सुर्वे एकदम नरमाईनं म्हणाले. “हे बघा, आम्ही काही वाईट हेतू ठेवून आलेलो नाही. जेव्हा चार लोकं बोलायला लागतात तेव्हा आम्हाला काहीतरी करणं भाग आहे. तुमच्या दोघांचं एकंदरीतच वागणं एवढं वेगळं आहे, म्हणजे आंतरप्रांतीय लग्न, तुमचं मुसलमानी नाव, आणि अजूनही बरंच काही... इथं कित्येक लोकांना ते पटत नाही..”


“मग मी काय करू? माझं नाव बदलू की माहीचं राज्य बदलून घेऊ? लोकांना चर्चा करायचीच असली तर ते कशाचीही करू शकतात. तेवढा रिकामावेळ त्यांच्याकडे असेल तर. सुदैवानं मी आणि माही दोघंही खूप बिझी आहोत. आमच्या कार्यक्षेत्रामध्ये. आमच्याकडे असल्या फालतू गोष्टींना वेळ नाही” असिफ आधी जितक्या शांत सुरात बोलत होता, तित्क्याच शांतपणे म्हणाला.


“आम्ही निघतो. तुम्हाला जी काही तसदी दिली त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही सर्व माहिती व्यवस्थितरीत्या दिल्यामुळं काहीच शंकेला वाव उरलेला नाही. हे फोटोकॉपीची एक प्रिंट मी मुद्दाम नेतो. कुणी काही बोललंच तर दाखवायला. चालेल?” सुर्वे उठून उभं राहत म्हणाला. त्याचबरोबर मघासचे ते आजोबा आणि अजून एक माणूस उभा राहिला. केतकरवहिनीने भुरेवहिनीला कोपरानं ढोसलं. “माही, येतो गं” त्यांनी आवाज दिला. 
“ती बाहेर येणार नाही. तिला त्रास होतोय, म्हणून थोडावेळ पडली आहे” असिफनं परस्पर उत्तर दिलं. 

ते पाचही जण निघून गेल्यावर असिफनं दरवाजा बंद केला, तरी तो तिथंच उभा राहिला. दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकून माही हॉलमध्ये आली. “असिफ” तिच्या डोळ्यांत पाणी होतं. “तू कधीच खोटं बोलत नाहीस ना? मग आज का बोललास?” ती त्याच्याजवळ येत म्हणाली. “खरं सांगितलं असतं तर प्रॉब्लेम झाले असते वगैरे ठिक आहे, पण आपण खोटं का बोलावं? तूच म्हणतोस ना... जे घडून गेलंय ते कुणाच्याही हातात नव्हतं”


“जे घडलं होतं ते जेसिकासोबत. तू माही आहेस. माझी माही. आणि तिच्यासोबत असलं काहीही वेडंवाकडं घडलेलं नाही... डोन्ट वरी” असिफ तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. “तू याबद्दल कुणाशी बोलली होतीस? रेश्माशी?” 
“रेश्मा?” नाव ऐकताच माही चमकली. “नाही.. मी फक्त एकदा मीरावहिनींना थोडं सांगितलं होतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट नाही... पण... त्या असं कुणाला बोलण्यातल्या नाहीत...” माही बोलत होती, पण असिफचं लक्ष नव्हतं. त्याला वाटलं आपल्या हृदयामध्ये कसलातरी ज्वालामुखी उकळतोय. हाताच्या मुठी त्यानं घट्ट दाबल्या आणि दरवाज्याचं हॅण्डल उघडलं. 


“काय झालं असिफ?” माहीनं विचारलं. 


“तू इथंच थांब” म्हणून असिफनं दरवाजा ओढून घेतला आणि चारेक पावलात पुढे जाऊन समोरच्या दाराची बेल वाजवली. दोनच सेकंदात दरवाजा उघडला, आणि समोर उभी असलेली रेश्मा बघून त्याचा संताप अजूनच वाढला. 
“अता... इथं...” तिनं काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण त्याआधीच असिफनं तिचे केस एका हातानं धरले, आणि दुसर्‍या हातानं तिच्या कानाखाली मारली. 


“अजून किती छळणार आहेस? कुठल्या जन्माचा बदला घेणार आहेस?” तो दात गच्च चावून म्हणाला. “आणि यात माहीचा यात काय संबंध होता? तिला का मध्ये आणलंस” आणि अजून एकदा त्यानं तिला मारलं. 


“असिफ.. प्लीज. मला काहीच माहित नाही.. काय बोलतोस?” ती कसंबसं म्हणाली. 


“काहीच माहित नाही.. बोल!” असिफ तिचं डोकं धरून भिंतीवर आपटत म्हणाला. “बोल! अजून खोटं बोल! काय बिघडवलं आहे मी तुझं... सुखानं जगतोय ते बघवत नाही. तुझ्या घरच्यांनी माझ्या बापाला मारलं होतं, तू त्यांच्याहून डेंजर आहेस. विंचवासारखी डसतेस मला. गेली सतरा वर्षं मला छळते आहेस...” रेश्मा जोरात किंचाळली. काही बोलायचं तिला सुचत नव्हतं. 


इतका आरडाओरडा ऐकून माही तिच्या घरातून बाहेर आली. असिफ रेश्माला मारत असलेलं बघून ती गडाबडली. “असिफ, काय करतोस? अरे, त्यांना सोड” ती मध्ये पडत म्हणाली. असिफने तिला हलकेच बाजूला ढकललं. 
“मध्ये पडू नकोस. हीच.. हीच ती मुलगी जी गेले सतरा वर्षं माझ्या आयुष्यामध्ये माती कालवतेय.... नक्की कशानं तिला समाधान मिळेल कुणास ठाऊक? लग्नाचं नाटक केलं, नंतर मलाच बलात्कारी म्हणून गाव सोडायला लावलं.... आणि आज इथं... का छळतेस?” परत एकदा असिफनं तिला मारलं. 


“नाही! असिफ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय..” माही त्याचा हात धरत म्हणाली. 


“तू हात सोड” असिफनं तिचा हात झटकला आणि परत रेश्माला धरून मारत म्हणाला. “बोल! माझा जीव घेऊन मग तू शांत होणार आहेस का? दोनच महिन्यापूर्वी मला हातभर लेक्चर देऊन गेलीस ना? माझ्यावर किती प्रेम आहे आणि अजूनही मीच कसा हवा आहे? तेव्हा एका क्षणाला तुझी थोडी तरी दया आली होती... कधीकाळची माझी पत्नी म्हणून आठवली होतीस... तेव्हा काय म्हणाली होतीस... असिफ एकदा तुझा स्पर्श हवाय... मग.. आता...” बोलता बोलता असिफ तिला लाथ मारत राहिला. माही परत मध्ये आली. “असिफ, स्टॉप दिस... आता बास... नक्की काय घडतंय ते मला समजत नाही. पण यापुढे एकदाही जर हात उचललास तर याद राख”


रेश्मा जमिनीवर पडून रडत राहिली. त्याच्या डोळ्यात पेटलेला वणवा अजूनची भडकलेलाच होता. असिफ माहीकडे बघून म्हणाला. “ही इथं आता जी रडत पडली आहे ती... रेश्मा आहे. माझ्याशी भातुकलीसारखं लग्नाचा खेळ मांडणारी... तू नसताना माझ्या घरात येऊन मला माझ्यासोबत झोप म्हणून सांगणारी.. .हिनंच तुझ्याविषयी बिल्डिंगमध्ये चर्चा चालू केली. हिनंच माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली. हिच्यामुळं मला माझ्या आईला दूर ठेवावं लागलं. शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.. एवढं होऊन... ” असिफ अचानक बोलायचा थांबला. 


दारामध्ये भाजीची पिशवी घेऊन मोहित उभा होता. “माझ्या घरामध्ये हे नक्की काय चालू आहे?” त्यानं कसंबसं विचारलं. “मीरा, हे मी काय ऐकतोय?” 

(क्रमशः) 


दरवाजा (भाग 8)

Thursday, 6 November 2014

दरवाजा (भाग 6)

नाही, असिफ. आज जोपर्यंत माझ्या मनात काय आहे ते तुला सांगत नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही... गेल्या पंधर्रा वर्षातील प्रत्येक क्षणाचा हिशोब तुला दिल्याखेरीज मी आज जाणार नाही....”
“मला काहीही ऐकायचं नाहिये. रेश्मा, मी आता शेवटचं सांगतो... प्लीज इथून जा” असिफ तिच्याकडे पाठ वळवून खुर्चीमध्ये बसला
“असिफ, एकदा फक्त मला बोलू देत.. फक्त एकदा. ऐकून घे”
असिफनं पुढ्यातलं स्केचबूक उघड्लं. काहीही गरज नसताना पांढर्‍य़ा कागदावर निळ्या पेन्सिलीनं रेघोट्या काढत बसला. रेश्मा दोन मिनिटं शांतपणे बसून राहिली.
“मी तसं वागायला नको हवं होतं..” ती म्हणाली. “मला तेव्हा खरंच काही सुचलं नाही. एके दिवशी कॉलेज संपवून घरी आले तर रवीदादानं आणि आईनं बोलायला सुरूवात केली. दादानं तर खूपच मारलं, तेव्हा मला समजलं की मला त्यानं तुझ्या खोलीवर....”
“घर.... आपलं घर. म्हणजे, तेव्हा तरी तू तसंच म्हणायचीस.” असिफ मानदेखील वर न करता म्हणाला. “आता त्या कशाहीबद्दल बोलून काही उपयोग नाही, हे मी तुला परत परत सांगतोय. तू तुझ्या आयुष्यात सुखी आहेस, मी माझ्या आयुष्यात...”
“नाही, असिफ, किती दिवस आपण दोघंही हे “सुखी आहोत” हा मुखवटा घालून एकमेकांसमोर येणार आहोत... कधीना कधी तरी...”
असिफने खुर्ची गर्रकन मागे फिरवली. “रेश्मा, तुझ्याबद्दल माहित नाही. पण मी माझ्या आयुष्यात खरंच सुखी आहे. इंडीयाचा टॉपमोस्ट सेट डीझायनर आहे. लाखो करोडोंची कामं करतो. कशाचीही कमी नाही... त्यामुळे मी कसलाही मुखवटा वगैरे घातलेला नाही. मी खुश आहे. कदाचित मी स्वत:ला जिथं पंधरावीस वर्षापूर्वी पाहत होतो, तिथं पोचलो नाही. पण तरीही मी खुश आहे”
“मग तू माहीसारख्या मुलीबरोबर का आहेस?.. तिनं मला सगळं खरं सांगितलंय.”
“व्हॉट डू यू मीन बाय... माहीसारख्या? माझी लाईफ पार्टनर मला जशी हवी तशीच माही आहे. म्हणून मी तिच्यासोबत आहे. हा पूर्णपणे ठरवून घेतलेला निर्णय आहे, कुणाच्याही भुलवण्यानं, खोटं बोलण्यानं किंवा खोट्या प्रेमांच्या शपथांना बळी न पडता. ती कितीही भांडली, कशीही वागली तरीही माझ्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा आहे आणि राहिल. तिनं तुला काहीही सांगितलं असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव.. माहीची आणि तुझी तुलना होऊ शकत नाही. ती मुलगीच या जगावेगळी आहे.”
“मी तिची आणि माझी तुलना स्वप्नांतदेखील करणार नाही... कारण.. काहीही असलं तरीही मी तिची जागा कधीही घेऊ शकणार नाही. तिनं जरी माझी जागा घेतली…”
असिफ हसला. “कुठली जागा? माझ्या आयुष्यात त्या संध्याकाळनंतर तुझ्यासाठी कसलीही जागा कधीच नव्हती.. माही माझ्यासाठी काय आहे हे तुला कधीच कळणार नाही... त्यामुळं मला आता पुन्हा हा विषय नको.. तुला तुझं चुकलं हे सांगायचं होतं ते सांगितलंस. माझ्या अक्षरश: पाठी लागून माझ्याशी लग्न केलंस. नंतर जेव्हा तुझ्या घरी समजलं तेव्हा खोटं बोललीस. मी तुझ्यावर जबरदस्ती केलीस म्हणून सांगितलंस. एवढा प्रचंड अपमान कधीच झाला नव्हता. तुझ्याबरोबर आयुष्याची स्वप्नं बघायला लागलो होतो. तू त्या स्वप्नांना बलात्कार ठरवलास. एवढं सगळं होऊन आज पंधरा वर्षांनी तू कुठल्या तोंडानं मला बोलतेस तेच मला समजत नाहीये”
असिफचं शांत बोलणं ऐकत असताना रेश्माच्या डोळ्यांतून पाणी यायला लागलं. “बोल... खरंच बोल, असिफ. चिडून बोल. संतापून बोल. मी जे काही वागले त्याला कसलीही शिक्षा असूच शकत नाही. मी कुठल्या तोंडानं एवढी तुझ्याशी बोलतेय, माफी मागतेय.. तुझ्या एका नजरेसाठी.. एकदा... एकदा एकदा असिफने वळून फक्त माझ्याकडे पहावं म्हणून झुरतेय.. हे कुणालाच समजणं शक्य नाहीये. तुला काय वाटतं. मी फार सुखी आहे. माझ्या संसारामध्ये, दोन मुलांमध्ये, नवर्‍यामध्ये. जगाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर हो! खूप सुखी आहे. देवाशपथ, एवढा चांगला नवरा मिळालाय. कशाचीच कमी नाही... पण माझ्यादृष्टीनं बघ. कधीतरी शक्य असेल ना, तर माझ्या मनाच्या डोहात उतरून बघ. मग कळेल तुला.... मागे काय म्हणालास मला... की तुला माझ्यावर कसलाही सूड उगवायचा नाही... चूक. साफ चूक आहे असिफ शेखर. तुम्ही तुमचा सूड माझ्या लग्नाच्या दिवसापासून आजवर उगवत आलेला आहात. प्रत्येक क्षणी... आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी तू माझ्यासोबत आहेस. खोटं वाटतंय तुला? पण हेच खरं आहे... यासाठी माझ्याकडे कसलाही पुरावा नाही.. असल्या गोष्टींचे पुरावे नसतात. पण आज मी जे सांगतेय त्यावर तुला विश्वास ठेवावाच लागेल. मी आपल्या लग्नाबद्दल खोटं बोलले. तू मला फसवलंस म्हणून सांगितलं. आईबाबांना ते पटलं होतं की नाही कुणास ठाऊक. पण तरी त्यांनी तेच खरं मानलं. मला लग्नाची मागणी आलेलीच होती. दोन महिन्यांमध्ये लग्न लावून दिलं. तोपर्यंत मी खुश होते. प्रचंड खुश. जे हवं होतं ते मला मिळालं होतं. चांगला बॅंकेमध्ये काम करणारा नवरा. मुंबईला फ़्लॅट होता, दागदागिने होते. खूप कौतुक होतं माझं. त्यावेळेला मी तुला विसरून गेले होते. आई म्हणाली तसं तो सगळाच पोरकटपणा होता. तुझ्यासोबत मी कसं आयुष्य काढलं असतं ना? तू तेव्हा रिक्षा चालवायचा, पहाटे लोकाच्या दारात दूध आणि पेपर टाकायचा. मी एवढ्या लाडाकोडांत वाढलेली आणि मी कशी राहिले असते तुझ्यासोबत? सकाळची चपाती मला रात्री चालायची नाही, अशी मी, तुझ्या घरांत शिळंपाकं खाऊन कसे दिवस काढले असते? मला तेव्हा आईचं म्हणणं पूर्णपणे पटलं. वाटलं, हो. हेच बरोबर आहे. माझ्या आयुष्याची नव्यानं सुरूवात करायलाच हवी. मोहितसोबत लग्न झालं. संसारही चालू झाला... तेव्हाही मी खूप खुश होते. मोहितला कधी याबद्दल काही सांगावंसं वाटलंच नाही. त्याला कधी संशयसुद्धा आला नाही. काही झालं तरी मी आता रेश्मा नव्हते. लग्नानंतर माझा पुनर्जन्म म्हणून मला मीरा नाव मिळालं होतं. मोहितची मीरा. मीराचा रेश्माशी काही संबंधच् नव्हता. मी नव्या नवरीची भूमिका अगदी परफेक्टली निभावत आणली. पहिल्या रात्रीपासून. आणि.. मग एके दिवशी सहजच.. सहजच. आणि तुझी आठवण आली. पहिल्यांदा.. इतक्या दिवसांमध्ये पहिल्यांदा मला असिफ आठवला. नुसता आठवला नाही. त्याचा आवाज, त्याचा स्पर्श, त्याचं स्वत:शीच हसल्यासारखं हसणं, हळूवारपणे एक एक शब्द मोजून बोलल्यासारखं बोलणं, त्याचं माझ्यावर... माझ्या शरीरावर एखादं चित्र काढत असल्यासारखं प्रेम काढणं... सगळं आठवत गेलं. लग्नानंतर त्या दिवशी मी वेड्यासारखी रडले. सासरी सगळ्यांना वाटलं की मला माहेराची आठवण येतेय म्हणून मी रडतेय... प्रत्येकानं खूप समजावलं. मोहित तर पूर्णपणे गोंधळले होते. काय करायचं ते कुणालाच सुचेना. मला एकटीलाच माहित होतं मला काय खुपतंय. मला काय हवंय. त्या रात्री विचार केला, खड्ड्यात गेली ती घरची इज्जत. खड्ड्यात गेलं ते लग्न. आताच्या आता निघायचं आणि तुझ्याकडं यायचं. तू हवा होतास. असिफ, फक्त तू हवा होतास...” रेश्मा बोलता बोलता थांबली. असिफ शांतपणे एकटक तिच्याकडे बघत होता. त्याच्या चेहर्‍यावर कसलाही भाव नव्हता. रेश्मानं डोळ्यांत आलेलं पाणी पुसलं. “मोहितला सांगित्तलं मला माहेरी नेऊन सोडा. मला बरं वाटलं की मी परत येईन. गावात आले तेव्हा समजलं की तू गाव सोडलंस. कुठं गेलास माहित नाही. कुणालाच माहित नव्हतं. चार दिवस गावात फिरले. मैत्रीणींना भेटण्याच्या निमित्तानं. पण तुझा ठावठिकाणा कुणाकडेच नव्हता. मग मोहित मला न्यायला आले. माझ्याशिवाय त्यांना करमत नव्हतं म्हणून. काय कारण देणार? परत सासरी आले. पण यावेळी येताना तूही सोबत आलास. प्रत्येक जागत्या झोपत्या क्षणाला, प्रत्येक सुखाला, प्रत्येक वेदनेला तू सोबत होतास. आजूबाजूलाच होतास कायम. मोहित ऑफिसला गेले की तुझ्याशी गप्पा मारायला लागले. तुझ्यासोबत वेळ घालवायला लागले. तू आणि मी एकत्रपणे घालवलेला वेळ पुन्हापुन्हा एकटीनं अनुभवत राहिले. सरत्या काळासोबत तुझ्या आठवणी संपत गेल्या, मग मी नवीन आठवणी बनवल्या. हा वेगळाच संसार तुझा आणि माझा. आपलंच दोघांचं विश्व. तिथं मी तुला परकं केलं नव्ह्तं, तुझ्यावर कसलाही दोषरोप लावलेला नव्हता. उलट फार हिमतीनं मी तुझा हात धरून तुझ्यासोबत आले होते. अख्ख्या जगाची पर्वा न करता. खोटं होतं, स्वप्नं होतं. माझ भास होता नाही... आहे... अजूनही आहे. इतक्या वर्षानंतरसुद्धा तू माझ्यासोबत आहेस. तुझा विश्वास बसत नाही... त्याला मी काहीच करू शकत नाही. पण हेच खरं आहे... मी तुला कधीच विसरले नाही. कारण विसरण्यासाठी तू माझ्या आयुष्यातून गेलाच नाहीस. अगदी मी बाळंतपणाच्या त्या वेदना सहन करत तळमळत दोन दिवस हॉस्पिटलमध्ये पडले होते, तेव्हा माझा हात हातात घेऊन मला समजावणारा, माझी सोबत करणारासुद्धा तूच होतास. त्या क्षणी मला मोहित नको हवा होता, असिफच हवा होता. या सर्वांच्या दरम्यान खरा असिफ कुठं आहे ते मला माहित नव्हतं. तुझं काय चालू आहे, काही माहित नव्हतं. त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काय करतो हे मला जाणून घ्यावंसंसुद्धा वाटलं नाही. पण मी खुश होते. कारण असिफ माझ्यासोबत होता. तुला समजतंय ना मी काय म्हणतेय ते? हे एवढं सगळं मी तुला का सांगतेय माहित नाही. पण तू इथं रहायला येऊन माझ्या त्या प्रत्येक विश्वाला सुरूंग लावतो आहेस. असिफ माझा होता. माझा एकटीचा. पण मग ही माही का त्याच्यासोबत आहे? खरा असिफ आणि माझ्या विश्वामधला हा असिफ... दोघं वेगळे नाहीत. एकच आहेत. मी त्याच्या प्रेमात कायमच होते. मी तुझ्या प्रेमात कायमच होते. पण मला हे फार उशीरा समजलं. जेव्हा समजलं तोपर्यंत... सगळीच समीकरणं बदललेली होती. आता माझ्यावर तुझा कसलाही हक्क उरला नाही, तुझ्या नजरेमध्ये तर मी पूर्णपणे अनोळखी बनून गेले. तुला आयुष्यामधून वजा केल्याची ही किंमत मी चुकवली. प्रत्येक क्षण केवळ तुझ्याच सोबत जगायची. मी आयुष्यात फक्त तुझ्यावर प्रेम केलं. फक्त तुझ्यावर!”
असिफ काही न बोलता उठला. किचनमध्ये जाऊन पाण्याचा ग्लास आणून रेश्मासमोर ठेवला. रेश्मा दोन घोट पाणी प्यायली. “एवढंच तुला सांगायचं होतं” थकल्या आवाजात ती म्हणाली.
“रेश्मा, एक प्रश्न विचारू?” थोड्या वेळानं तो तिच्यासमोर येऊन उभं राहत म्हणाला. तिनं मान वर करून त्याच्याकडे पाहिलं.
“धर माझा हात. येतेस?” त्यानं त्याचा हात पुढं करत विचारलं. काही न समजल्यानं तिनं गोंधळून त्याच्याकडं पाहिलं. “गेल्या पंधरा वर्षांना तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही आयुष्यातून वजा करू. पुन्हा नव्यानं सुरूवात.. येतेस सोबत?” रेश्मा अचानक गडबडली.
“असिफ, अरे! काय बोलतोस? कसं शक्य आहे? म्हणजे…मोहित... चैत्रा अश्विन.. मी सगळं..” ती म्हणाली.

“रेश्मा, तेव्हा जशी होतीस तशीच आजही आहेस. नुसतं माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे म्हणणं. आणि ते सत्य आहे, मला मान्य आहे. तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे, तुझ्या नजरेमध्ये कायम दिसतं” असिफनं पुढं धरलेला हात मागे घेतला. “पण नुसतं प्रेम असून चालत नाही. ते निभवण्याची हिंमतही लागते. ती मात्र तुझ्यामध्ये कधीच नव्हती, आज इतक्या वर्षांनीदेखील नाही. पंधरावर्षापूर्वीचं तुझं लॉजिक बरोबर होतं. माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत आयुष्य काढण्याची कल्पना करणं खरंच फार प्रॅक्टिकल नव्हतं. पण आज जेव्हा मी जगातलं प्रत्येक सुख तुझ्या पायावर टाकण्यासाठी समर्थ असतानासुद्धा तू माझ्यासोबत येऊ शकत नाहीत. येणं तर लांब, तसा विचारदेखील करू शकत नाहीत. ती मानसिक कुवतच नाही. कारण, तुला कधीच कसलाच संघर्ष करायचा नसतो. तुला फक्त ईझी वे हवा असतो.” असिफ शांतपणे म्हणाला.

“तू असं अचानक विचारलंस की मी... पण...”
“घाबरू नकोस. तुला नसेल, पण मला तुझ्या नवर्‍याची आणि दोन मुलांची चिंता आहे. मला कुणाचाही संसार मोडायचा नाही. तुला फक्त तुझं प्रेम किती तकलादू आहे तेच दाखवायचं होतं. या प्रेमाला काहीही अर्थ नाही”

“तुझ्या दृष्टीनं नसेल, पण माझ्यासाठी आहे. तुला ते तकलादू वाटत असेल.. अचानक असं फिल्मी स्टाईलने तू हात पुढे करावास आणि मी तो लगेच धरावा.... हे शक्य नाहीये. मी तुझ्यावर कितीही प्रेम करत असले.... कितीही वेळ तुझाच विचार करत असले तरीही मी मोहितना सोडू शकत नाही. माझ्या दोन लहान मुलांना मी अनाथ करू शकत नाही...”

“मी. माझा नवरा. माझी मुलं.... एवढंच सुचतं ना तुला? कधी विचार केलास... माझ्या आईला तुझ्या बापानं आणि भावानं चार दिवस कोंडून ठेवलं होतं. मला मारायचं ठरवलं होतं. त्याचदरम्यान माझ्या वडलांच्या खुनाच्या केसच्या तारखा पडल्या होत्या, तेव्हा ही भानगड नको, म्हणून मी वाचलो. नाहीतर तुझ्यापायी वडलांसारखाच मेलो असतो. काय हवं होतं तुला? पैसा, दागिने, घर, गाडी! आणि मी तुला हे दिलंच नसतं असं तुला का वाटलं? कशामुळे? माझ्यावर विश्वास नव्हता..... मी आयुष्यात कधीच काहीच करू शकलो नसतो असला लूजर वाटलो होतो? शिक्षण अर्धवट सोडल्यावर याच हातांनी काम करून हे सगळं मी कमावलंय. एकदाही.... एकदाही आजवर कुणाला फसवलेलं नाही, कसली लांडीलबाडी केली नाही. ज्या बिल्डींगमध्ये तुझा वन बी एचकेचा सासर्‍यानं घेतलेला फ़्लॅट आहे, तिथंच माझा टू बी एच केचा स्वकमाईवर घेतलेलं घर आहे. दोन गाड्या आहेत. थोडाफार सेलीब्रीटी पण आहे. देशा-परदेशांमध्ये चिकार फिरतो. हेच सर्व तुला हवं होतं.... मी दिलंच नसतं... हो ना?”

“असिफ, मला तुझ्याइतकी अक्कल कधीच नव्हती. मी कधी इतका विचार केलाच नाही. आईनं त्या दिवशी मला जे समजावलं ते मला पटलं....”

“काय पटलं? असिफ खालच्या जातीचा आहे. की मग त्याच्याकडं रहायला घर नाही की मग त्याच्याकडे पैसा नाही.. काय पटलं?”
रेश्मा काही न बोलता गप्प बसली. “मी सांगू? आयुष्यभर त्या वेड्याबाईचं हगणं मुतणं काढत बसणार आहेस का? त्यानं तुझ्याशी लग्न वगैरे नाटकं केलीत कारण त्याला आईला सांभाळायला आयती नोकराणी हवी आहे हे वाक्य तुला पटलं” तिनं चमकून त्याच्याकडं पाहिलं. “हो. मला त्या दिवशी देवघरात बसून तुझं आणि तुझ्या आईचं काय बोलणं झालं ते शब्दनशब्द समजलं. तुमच्या घरात तुळजाई काम करायची, तिनं मला भेटून हे सगळं सांगितलं.... माझ्या आईसाठी मी एकवीस वर्षं एकटाच होतो, नंतरही आयुष्यभर मीच एकटा राहिलो. तुझ्या अमाप कृपेनं वेळ आली तेव्हा तिला अनाथासारखं ठेवलं. पण तुझ्याशी लग्न करताना चुकूनही मी असला विचार केला नव्हता, जो तुझ्या आईनं तुला सांगितला. राग तुझ्या आईचा नाही, तुझा आला. कारण तुला ते पटलं. तू तेच खरं मानलंस. हे ओळखलं होतंस तू मला? ही किंमत केलीस? म्हणून खोटं बोललीस? स्वत:शी, आईवडलांशी, नवर्‍याशी? आणि आज मला त्या खोटं बोलण्याचं काहीतरी लंगडं समर्थन देतेस? काय भोगलंस... काहीतरी वेड्यासारखं माझं तुझ्यावर कायम प्रेम होतं, एवढं एक वाक्य म्हटलं की झालेला प्रत्येक प्रमाद संपला?” असिफ अगदी हळू आवाजात बोलत होता, तरीपण त्या प्रत्येक शब्दांतला संताप रेश्माला जाणवत होता.
“मी तुला गेल्या पंधरावर्षातल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब देऊ? तुझ्या एका स्वार्थापायी माझी झालेली परवड सांगू? एक आसरा होता, माझी आई. तिला माझ्यापासून दूर ठेवलं. एक स्वप्न होतं, खूप शिकायचं. ते स्वप्न तुटलं. एक इच्छा होती, कुठेतरी काहीतरी चांगलं काम करायचं. इथं बेगडी खोटी घरं सजवत मोडत बसलो. काय चुकलं होतं माझं? तुझ्यावर विश्वास ठेवला. तुझ्याशी लग्न केलं? लग्न म्हणजे सातजन्माचा साथीदार वगैरे काहीतरी बावळट कल्पना मनात बाळ्गल्या. हेच चुकलं? कधी एकदातरी विचार केलास.. काय अवस्था झाली असेल माझी? एकटा! एकटा होतो. आयुष्याशी नाळ बांधून ठेवणारी प्रत्येक गोष्ट तू माझ्यापासून तोडलीस. आणि ते तोड्ताना तुला काहीहीसुद्धा वाटलं नाही. तुला असं वाटलं की जितक्या सहजगतीनं तू मला विसरलीस, तितकं मीही तुला विसरून गेलो असेन. कसा विसरू? आईला त्या आश्रमात सोडून येताना... खंडणी मागितल्यासारखे तुझ्या बापाकडे पैसे मागताना.. झोपडपट्टीमधल्या एका खोलीमध्ये चार जणांबरोबर राहताना... फिल्मी जगामधल्या लोकांसोबत राहताना.. दोन दिवसांतून एकदा जेवताना.. हातोड्यानं खिळे ठोकून हाताला घट्टे पडत असताना.. ज्याचा बाप आयुष्यभर देवदासीप्रथेसारख्या गोष्टींविरूद्ध लढला, त्याच्याच मुलानं एका वेश्येला विकत घेत असताना... तुला कसा विसरू? माझ्या इतक्या संघर्षामध्ये एक गोष्ट माझ्यासोबत योग्य झाली असेल तर ती माही. मी माझ्या आयुष्यामध्ये तिला विकत आणलं. आजवर मला कुठल्या गोष्टीचा पश्चाताप होत असेल तर या फक्त याच गोष्टीचा.. माझी आयुष्याची जोडीदार मी अशी आणायला नको हवी होती. पण त्यावेळेला मला जे सुचलं तेच मी केलं..मला जेवढं शक्य होतं तितकंच केलं.”
“मग तू तिच्याशी लग्न का करत नाहीस? ती त्याच गोष्टीवरून भांडून गेली आहे ना...”
असिफ गालात हसला. “तुला कसं सांगू?समजणार आहे ही गोष्ट? किती बदलत गेलो ना... जोपर्यंत तुझ्या गळ्यांत मंगळसूत्र बांधलं नव्हतं, तोपर्यंत तुझ्या अंगाला हातसुद्धा लावला नाही. पाप असतं.. असं मीच तुला सांगितलेलं. आपण केलं ते लग्नच होतं ना... मग ते नातं तुझ्या बाजूनं तोडून टाकलंस ना... संपल्या त्या सर्व भावना. संपलं ते नातं. मला तेच माझ्या आणि माहीच्या नात्यांत नकोय. लग्नाची फॉर्मॆलिटी. आज मला ती आवडते, तिला मी आवडतो.. म्हणून एकत्र आहोत. उद्या दोघांपैकी कुणाचंही मन उडालं तर वेगळे व्हायला स्वतंत्र आहोत....”
“असिफ, खोटं बोलतोयस.. अजूनही तुला खोटं बोलता येत नाही”
“मग आता तू शिकवशील मला? ट्युशन घे. खोटं कसं बोलायचं. आठ महिन्यापूर्वी ज्याच्यासोबत लग्न केलं त्यालाच “बलात्कारी” कसं म्हणायचं. पंधरावर्षं ज्याच्यासोबत संसार करतेस त्याला तुझ्या भूतकाळाविषयी एकही शब्द न सांगता रहायचं. शिकवशील मला?”
“असिफ, पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते. पुन्हा तो विषय काढू नकोस. जुन्या जखमा ओल्या करून...”
“माझ्या जखमा कधीच भरल्या नाहीत. आजपर्यंत ओल्याच ठसठसत राहिल्या. कायम तश्याच राहतील. तू कितीही माफी मागितलीस तरी मी माफ करू शकणार नाही. तेवढं मोठं मन माझ्याजवळ नाही. तुला जे सांगायचं होतंस. ते सांगितलंस, मला जे बोलायचं होतं तेही बोलून झालंय. यापुढे मी तुझ्यावर दोषारोप करणं आणि तू माफी मागणं हेच एक चक्र चालू राहील. यातून साध्य काहीच होणार नाही... जा. तुझ्या घरी जा.”
रेश्मानं परत एकदा डोळे पुसले. “मी तेव्हा हिंमत दाखवून तुझ्यासोबत यायला हवं होतं” ती हलकेच म्हणाली.

“बरं झालं नाही आलीस. मला माही भेटली नसती. माहीला भेटल्यावर मला समजलं, प्रेम काय असतं. तुझ्यासोबत जे होतं ते सगळा शरीराचा व्यापार होता. त्यात मी कधी मनापासून नव्हतोच. माहीमुळे मला पहिल्यांदा जाणवलं, एखाद्यासाठी आयुष्य झोकून देणं काय असतं. मी आज जे काही आहे, ते माहीसाठी. माहीमुळे.... रेश्मा, तू माझ्या आयुष्यातली सगळ्यांत मोठी चूक होतीस. आणि माही माझ्या आयुष्यामधली सर्वात बरोबर आलेली गोष्ट...”

“माझं चुकलं.. तेव्हा मी…”
“हे सांगून झालंय तुझं. परत परत तेच बोलायला माझ्याकडे वेळ नाही. इतरही कामं आहेत. हातावर पोट असणारी माणसं आहोत. तुझ्यासारखं आयतं कधीच काही मिळत नाही.” असिफ पुन्हा एकदा खुर्चीवर बसत म्हणाला. “जाताना दरवाजा ओढून जा”
“असिफ! तुझा राग, तुझा संताप सगळं मान्य आहे. पण फक्त एकदा माझ्या समाधानासाठी मला माफ केलंय असं म्हण. परत कधीही तुझ्याशी किंवा माहीशी बोलणार नाही. तुमच्यामध्ये कधीही…”
“प्लीज, रेश्मा! स्वत:विषयी इतक्या महान भावना बाळगू नकोस. तू आमच्यामध्ये येण्याइतकी महत्त्वाची नाहीस हे कितीवेळा आणि अजून किती स्पष्ट शब्दांत सांगू?”
“खोटं बोलू नकोस. तसं असतं तर मग माही इतक्यावेळा भांडत असूनसुद्धा का लग्न करत नाहीस.. अजून मी कुठेतरी मनामध्ये आहे, तिरस्कार म्हणून का होइना, कडवेपणा म्हणून का होइना, मी आहेच…”
असिफ काही न बोलता शांत बसून राहिला. “मी खरंच जातेय, असिफ. जेवढं मला सांगायचं होतं, तेवढं सांगितलंय. माफी मागितली आहे. गेलेला काळ कधीही परत येत नाही, पण जर कधी परत आलाच तर मी माझी चूक सुधारायला तयार आहे...” बोलताना ती क्षणभर थांबली, “मी आजही ती चूक सुधारायला तयार आहे... मघाशी म्हणालास ना... मी जर तुझ्यासोबत आज यायला तयार असले तर...तर..”
“मघाशी मी हेदेखील म्हणालो की, मला कुणाचाही संसार मोडायचा नाही. माझा तूच मॊडला होतास. त्यामुळं ते दु:ख काय आहे ते पुरेपूर अनुभवलंय. आई असून नसल्यासारखा अनाथासारखा वाढलोय, त्यामुळं कुणाच्याही मुलांना तसलं काही बालपण द्यायचा इरादा नाही. तू तुझ्या संसारात सुखी आहेस. तशीच रहा..”
“एकदा फक्त असिफ. एकदा मला तुझ्याजवळ येऊ देत.. तुझा स्पर्श अनुभवू देत..” रेश्मा हलकेच कुजबुजली.

“सॉरी, रेश्मा. परत त्या प्रलोभनाला मी बळी पडणार नाही. आता तितका बावळट राहिलो नाही. घरी जा. शाळेतून तुझी मुलं येतील. तुला इथं बघून काहीतरी विचारतील. तुझा काय प्रश्न नाही. परफेक्टली खोटं बोलशील. मला बोलता येणार नाही. जा!”

“मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही...” ती मुसमुसत म्हणाली.
“गेले पंधरा वर्षं कशी जगलीस ते पाहतोच आहे.” असिफ खुर्चीवरून उठला आणि त्यानं पुढे येऊन फ्लॅटचा दरवाजा उघडला पण रेश्मा जागची हलली नाही.. “तू जाणार नाहीस तर ठिक आहे. मीच घराबाहेर पडतोय..”
रेश्मा डोळे पुसत ऊठली. “नको.. मी निघते.” म्हणून ती घराबाहेर पडली.
असिफने लगेच दरवाजा बंद करून घेतला आणि सुन्नपणे कितीतरी वेळ बसून राहिला.
++++++++++
खणाखण मोबाईलची रिंग वाजत राहिली, तसा असिफ झोपेतून जागा झाला. सकाळचे साडेसात वाजले होते. आजचं शेड्युल दुपारी तीननंतर चालू होणार होतं, त्यापैकीच कुणाचा काहीतरी फोन असेल म्हणून त्यानं झोपेतच मोबाईल कानाला लावला. “बोलो”
“असिफ.. मी बोलतेय” पलिकडून माहीचा आवाज आल्यावर मात्र तो चांगलाच जागा झाला.
“माही! कुठं आहेस? एवढ्या सकाळी का फोन केलास? एव्हरीथिंग इज ओके?” त्यानं विचारलं.
पलिकडून काहीही आवाज आला नाही. “माही! प्लीज काहीतरी बोल. कुठं आहेस? ऑफिसमधून निघालीस का? मी तुला न्यायला येऊ??.. घरी ये ना!”
“असिफ.. मला तुला काहीतरी सांगायचंय...”
“जे काही सांगाबोलायचं ते घरी आल्यावर. इतकं भांडायची गरज आहे का? जवळ जवळ दीड महिना होत आलाय. मी फोन केला तर फोन उचलत नाहीस. मेल्स मेसेज कशालाच उत्तरं नाहीत. ऑफिसमध्येच राहतेस, कशासाठी? मी इथं रोज तुझी वाट बघतोय. हे असं कशाला?”
“मला पण तुझी खूप आठवण येतेय. पण तरीही...”
“आता कसला पण बिण काही नाही. तुझा प्रत्येक हट्ट, प्रत्येक मागणी मला मान्य आहे. इतके दिवस माझा फुकटचा इगो पोसत होतो. तू इतकी दूर जात असशील तर भाडमध्ये गेला तो इगो. तू हवीस. तू नाहीस तर घर फार सुनं सुनं झालंय. तू ताबडतोब घरी ये. आपण लग्न करू. तू म्हणशील तसं.”
"निव्वळ माझा हट्ट म्हणून?"
"नाही. मला असं फोन्वर सांगता येणार नाही. तू घरी ये मग आपण बोलू:"
माहीचा हसण्याचा आवाज आला “आधी मला काय सांगायचंय ते ऐक. त्यानंतरही मी घरी परत यायला हवी असेन का? ते सांग....”
“ऐकायचंच नाहीये मला. तू घरी ये. माझ्यासमोर बस आणि तुला काय सांगायचंय ते सांग. या घराला, या जगण्याला कशालाच अर्थ नाही. तू नसलीस तर...” बोलताना अचानक असिफचा आवाज भरून आला. “मी रडून हात जोडून माफी मागितल्यावर परत येणार आहेस का? मी साष्टांग नमस्कार घालून माफी मागायला तयार आहे. पण तू परत ये”
“तू परत ये, एवढयच मंत्राचा जप करणार आहेस का?” ती पुन्हा हसत म्हणाली.
“मला तुझ्यासारखं छान छान बोलता येत नाही म्हणून नाहीतर थांब, कुणाकडून तरी कविता वगैरे लिहून आणून तुला ऐकवतो. तमिळ कविता, पण तू परत ये. तुझ्या घरी.....”
“असिफ, ऐक ना. मलाही परत यायचं आहे, पण माझा लग्नाचा हट्ट आता फार क्षुल्लक वाटतोय.. असं काहीतरी घडलंय... असिफ.. आय ऍम प्रेग्नंट” माही अचानक म्हणाली. पलिकडून असिफचा थांबलेला श्वास तिला जाणवला. पण तो काहीही बोलला नाही. “असिफ.. ऐकतोयस ना?”
“नाही. तू घरी परत ये. तेव्हाच हे सगळं मला सांग. आता मी काहीही ऐकलेलं नाही, आणि मी त्याबद्दल काही बोलणार नाही. तू परत ये.”
"अजूनही आपलं नातं तसंच आहे?"
"कायम राहिल. पण तू घरी ये. इतकं पण सतावू नकोस."
“कधी परत येऊ?” माही हसत म्हणाली.
“कधी म्हणजे काय? आता लगेच. ताबडतोब. कुठं आहेस सांग? मी तुला न्यायला येतो. कुठं आहेस?”
“मी कुठं असणार? तुझ्यापासून जाऊन जाऊन किती लांब असणार? दरवाजा उघड. आपल्याच दारासमोर उभी आहे.” ती हसत म्हणाली.
(क्रमश:)


दरवाजा भाग 7